मुंबई काँग्रेसकडून प्रकाशित करण्यात येणाऱ्या ‘काँग्रेस दर्शन’ या हिंदी मुखपत्रात पंडीत नेहरूंविषयी आक्षेपार्ह मजकूर छापण्यात आल्याप्रकरणी सोमवारी सुधीर जोशी यांची वृत्तपत्राच्या कंटेट एडिटर पदावरून उचलबांगडी करण्यात आली. तत्पूर्वी याप्रकरणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि ‘काँग्रेस दर्शन’चे संपादक संजय निरूपम यांनीदेखील काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली.
पंडीत नेहरूंनी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचे ऐकले असते, तर आज शेजारील देशांमुळे उदभवणारे प्रश्न निकाली निघाले असते, असे एका लेखात लिहिण्यात आले आहे. वल्लभभाई पटेल यांच्याकडे उपपंतप्रधानपद आणि देशाचे गृहमंत्रीपद असले, तरी पंडीत नेहरू आणि त्यांच्यातील संबंध कायम तणावपूर्ण होते. दोघांनीही कायम एकमेकांना राजीनामा देण्याचा इशारा दिला. जर पंडीत नेहरूंनी पटेल यांचा दूरदृष्टीकोन ओळखला असता, तर भारतापुढील अनेक आंतरराष्ट्रीय प्रश्न आज उदभवलेच नसते. पंडीत नेहरूंना १९५० साली लिहिलेल्या एका पत्रात पटेल यांनी चीनबद्दल सावधगिरीचा इशारा दिला होता. चीन हा अजिबात विश्वासार्ह देश नाही आणि तो भविष्यात भारताचा शत्रू ठरू शकतो, असा इशारा पटेल यांनी दिला होता. काश्मिरचा प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघात नेण्यालाही पटेल यांनी त्यावेळी विरोध केला होता, असेही या लेखात म्हटले होते.
मुंबई काँग्रेसच्याच मुखपत्रामध्ये थेट माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका करण्यात आल्यामुळे पक्षाच्या १३१व्या वर्धापनदिनीच मुंबईतील काँग्रेसचे नेते अडचणीत सापडले होते. त्यामुळे एकुणच राजकीय वर्तुळात मोठ्याप्रमाणावर खळबळ उडाली होती. दरम्यान, संजय निरूपम यांनी याप्रकरणी सारवासारव करताना अन्य ठिकाणची माहिती कोणतीही खातरजमा न करता वृत्तपत्रात छापण्यात आल्यामुळे हा प्रकार घडल्याचे सांगितले. भविष्यात या प्रकाराची पुनरावृत्ती होणार नाही याचीही काळजी घेतली जाईल असे सांगत निरूपम यांनी कारवाईचे संकेत दिले होते.
पंडीत नेहरूंनी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचे ऐकले असते, तर आज शेजारील देशांमुळे उदभवणारे प्रश्न निकाली निघाले असते, असे एका लेखात लिहिण्यात आले आहे. वल्लभभाई पटेल यांच्याकडे उपपंतप्रधानपद आणि देशाचे गृहमंत्रीपद असले, तरी पंडीत नेहरू आणि त्यांच्यातील संबंध कायम तणावपूर्ण होते. दोघांनीही कायम एकमेकांना राजीनामा देण्याचा इशारा दिला. जर पंडीत नेहरूंनी पटेल यांचा दूरदृष्टीकोन ओळखला असता, तर भारतापुढील अनेक आंतरराष्ट्रीय प्रश्न आज उदभवलेच नसते. पंडीत नेहरूंना १९५० साली लिहिलेल्या एका पत्रात पटेल यांनी चीनबद्दल सावधगिरीचा इशारा दिला होता. चीन हा अजिबात विश्वासार्ह देश नाही आणि तो भविष्यात भारताचा शत्रू ठरू शकतो, असा इशारा पटेल यांनी दिला होता. काश्मिरचा प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघात नेण्यालाही पटेल यांनी त्यावेळी विरोध केला होता, असेही या लेखात म्हटले होते.
मुंबई काँग्रेसच्याच मुखपत्रामध्ये थेट माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका करण्यात आल्यामुळे पक्षाच्या १३१व्या वर्धापनदिनीच मुंबईतील काँग्रेसचे नेते अडचणीत सापडले होते. त्यामुळे एकुणच राजकीय वर्तुळात मोठ्याप्रमाणावर खळबळ उडाली होती. दरम्यान, संजय निरूपम यांनी याप्रकरणी सारवासारव करताना अन्य ठिकाणची माहिती कोणतीही खातरजमा न करता वृत्तपत्रात छापण्यात आल्यामुळे हा प्रकार घडल्याचे सांगितले. भविष्यात या प्रकाराची पुनरावृत्ती होणार नाही याचीही काळजी घेतली जाईल असे सांगत निरूपम यांनी कारवाईचे संकेत दिले होते.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 28-12-2015 at 17:35 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Content editor of mumbai cong journal sudhirjoshi sacked