लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : पूर्व द्रुतगती मार्गावरील चुनाभट्टी आणि एव्हरार्ड नगर येथील रहिवाशांसाठी असलेला भुयारी मार्ग सध्या धोकादायक झाला आहे. या भुयारी मार्गाला सध्या मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या असून पालिकेने तत्काळ याची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

High Court question to State Government Municipal Corporation about making hawkers free street
पंतप्रधानांसाठी पदपथ मोकळे होतात; तर सर्व सामान्यांसाठी का नाही? उच्च न्यायालयाचे राज्य सरकार, महापालिकेला संतप्त प्रश्न
oxygen Scam in Corona Give permission for the action of employees after considering everything says HC
करोना काळातील प्राणवायू प्रकल्प घोटाळा : सारासार विचार करून कर्मचाऱ्यांवीर कारवाईसाठी मंजुरी द्या, उच्च न्यायालयाचे महापालिकेला आदेश
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
new scheme for poor women in maharashtra
महाराष्ट्रात लाडकी बहीण; मध्य प्रदेशच्या धर्तीवर गरीब महिलांना दरमहा १२०० ते १५०० रुपये
Ghatkopar hoardings
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट; होर्डिंगला परवानगी देणाऱ्या IPS अधिकाऱ्याच्या पत्नीचं कनेक्शन? अनोळखी खात्यातून व्यवहार
Rohit Sharma abused Rishabh Pant and badly scolds for Dropped Easy Catch of Mitchell Marsh Video Viral
ऋषभ पंतने सोपा झेल सोडल्याचे पाहता रोहितने भर मैदानात घातली शिवी, रागाने लालबुंद झालेल्या कॅप्टनचा VIDEO व्हायरल
thieves beat up the employees and stole the catering materials
मुंबई : कर्मचाऱ्यांना मारहाण करून चोरट्यांनी पळवले केटरिंग साहित्य
South African fans object to Surya's catch
सूर्यकुमार यादवच्या ‘कॅच’वरुन पेटला नवा वाद, दक्षिण आफ्रिकन चाहत्याने VIDEO शेअर करत केला फसवणूक झाल्याचा दावा

चुनाभट्टीतील नागरिकांना पूर्वी सोमय्या रुग्णालय आणि पूर्व द्रुतगती मार्गापर्यंत पोहोचण्यासाठी मोठा वळसा घालावा लागत होता. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पालिकेने २००१ला एव्हरार्ड नगर बस थांबा ते चुनाभट्टी असा हा भुयारी मार्ग तयार केला. मात्र गेल्या काही वर्षांत या भुयारी मार्गाची मोठ्या प्रमाणात दयनीय अवस्था झाली आहे.

आणखी वाचा-मुंबई : विरुद्ध दिशेने वाहन चालविल्याप्रकरणी ७३२ गुन्हे

अनेकदा भुयारी मार्गात पाणी येत असल्याने विद्यार्थी तसेच इतर नागरिकांना त्याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात तर तेथे मोठया प्रमाणात पाणी भरत असल्याने पालिकेला तेथे पंप बसवावे लागतात. गेल्या काही महिन्यांपासून भूयारी मार्गाला एव्हरार्ड नगरच्या प्रवेशद्वाराजवळ मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत. त्यामुळे जीव मुठीत घेऊन नागरिक हा भूयारी मार्ग पार करत आहेत.

एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी पालिकेने या भुयारी मार्गाची दुरुस्ती करून तेथे पादचारी पूल बांधावा अशी मागणी माजी नगरसेवक कप्तान मलिक यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पालिकेच्या एल विभागाला पत्रही दिले आहे.