मुंबई : वायव्य लोकसभा मतदारसंघाच्या निकालाबाबत एकीकडे उद्धव ठाकरे गटातर्फे संशय व्यक्त केला गेला असून याप्रकरणी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. त्याचवेळी, लोकसभा निवडणूक मतमोजणीच्या दिवशी ठाकरे गटाचे विधान परिषद आमदार विलास पोतनीस यांनी शस्त्रधारी पोलीस अंगरक्षकासह मतमोजणी केंद्रात प्रवेश केल्याच्या आरोपाप्रकरणी रविवारी रात्री उशिरा वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यामुळे, दोन्ही शिवसेनेतील या वादाला आणखी नवे वळण मिळाले आहे.

मुंबई वायव्य लोकसभा मतदार संघात महायुतीकडून रवींद्र वायकर यांनी, तर महाविकास आघाडीकडून अमोल कीर्तिकर यांनी लोकसभेची निवडणूक लढवली. गोरेगाव येथील नेस्को केंद्र येथे ४ जून रोजी या लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी पार पडली. मात्र, बऱ्याच नाट्यमय घडामोडीनंतर अखेर वायकर यांना ४८ मतांच्या आघाडीने वियजी घोषित करण्यात आले. त्यानंतर, या मतदारसंघातील निकालाबाबत चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यातच, ठाकरे गटाने मतदानयंत्राशी छेडछाड केल्याचा आरोप करून वायकर यांना विजयी घोषित करण्याबाबत संशय व्यक्त केला.

Badlapur encounter case, High Court question,
बदलापूर चकमक प्रकरण : शिंदेला लागलेली गोळी कशी सापडली नाही ? उच्च न्यायालयाचा पोलिसांना प्रश्न
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
youth congress taluka president rape
चंद्रपूर: तालुका युवक काँग्रेसच्या नेत्यावर अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचाराचा केल्याचा आरोप, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
Mumbai University General Assembly Election result today Mumbai
अधिसभा निवडणुकीचा निकाल आज; याचिकाकर्त्यांची स्थगितीची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली
काँग्रेस नेत्या रश्मी बर्वेंना लोकसभा निवडणुकीपासून वंचित ठेवणारा निर्णय अवैध
Controversial statement case High Court orders Thane Magistrate in case against Jitendra Awhad
वादग्रस्त वक्तव्याचे प्रकरण: जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा नोंदवण्याच्या मागणीचा पुनर्विचार करा,उच्च न्यायालयाचे ठाणे न्यायदंडाधिकाऱ्यांना आदेश
Arvind Kejriwal Bail
Arvind Kejriwal Bail : ‘कार्यालयात जाता येणार नाही, फाईल्सवर सही करता येणार नाही’, केजरीवालांना न्यायालयाने कोणत्या अटींवर जामीन मंजूर केला?
mumbai high court Nagpur Bench
आकस्मिक निधीत सहकार्याची मागणी भ्रष्टाचार नव्हे…कोर्टाच्या एका निर्णयाने लाचखोरीच्या आरोपीला…

हेही वाचा >>>ठाकरे गटाच्या आमदारावर गुन्हा; मतमोजणी केंद्रात शस्त्रधारी पोलीस अंगरक्षकासह प्रवेश केल्याचा आरोप

दुसरीकडे, निवडणूक नियमांचे ठाकरे गटाकडून उल्लंघन झाल्याचा दावा वायकर यांनी केला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत अधिकृत ओळखपत्र देण्यात आलेल्यांनाच मतदानाच्या दिवशी मतमोजणी केंद्रात प्रवेश देण्यात येत होता. मात्र, मतमोजणी प्रक्रिया सुरू असताना पोतनीस यांनी वर्दीतील अंगरक्षकासह मतमोजणी केंद्रात सायंकाळी चार ते रात्री ८ या वेळेत प्रवेश केला. कीर्तिकर यांनीही मतमोजणी केंद्रात प्रेवश केला होता. याबाबत आपण निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती, असा दावा वायकर यांनी केला.

निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेले प्रवेशाचे ओळखपत्र नसलेल्या व्यक्तींना मतमोजणी केंद्रात प्रवेश देण्यात येत नाही. असे असताना आणि तसे स्पष्ट आदेश असतानाही कीर्तिकर आणि पोतनीस यांनी निवडणूक आयोगाच्या नियमावलीचा भंग करून मतमोजणी केंद्रात प्रवेश केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी वायकर यांनी केली.