प्रसाद रावकर
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबापुरीला नागरी सुविधा पुरविणाऱ्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक नेमकी कधी होणार याबाबत अद्यापही स्पष्टता नाही. दिवाळीनंतर निवडणुकीचे बिगूल वाजेल आणि रण पेटेल अशी चर्चा राजकीय नेते, इच्छुक आणि कार्यकर्त्यांमध्ये रंगू लागली आहे.
गेल्या आठवडय़ात मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग आरक्षणाची सोडत पार पडली आणि चर्चेला उधाण आले. इतर मागासवर्गीय प्रवर्गाच्या आरक्षणासह लवकरच पुन्हा एकदा सोडत काढली जाईल असा तर्कही लढविला जात आहे, असो. मात्र तूर्तास उमेदवारी मिळणारच या अपेक्षेने अनेकांनी गुढघ्याला बाशिंग बांधायला सुरुवातही केली आहे. तर काही मंडळी इतरांचे पत्ते कापून उमेदवारी मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. एकूण प्रतिस्पध्र्याशी लढताना प्रत्येक राजकीय पक्षाला बरीच ताकद पणाला लावावी लागणार आहे. त्यातच उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या लक्षात घेता बंडाळी माजू नये याची काळजी घेताना पक्षांची दमछाक होणार असेच दिसत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा