लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबई-नाशिक महामार्गाच्या दुरवस्थेवरून विरोधकांनी गुरुवारी सरकारला धारेवर धरले. गेल्या पावसाळी अधिवेशनात मार्चपूर्वी या रस्त्याची दुरुस्ती करण्याची ग्वाही सरकारने विधिमंडळात दिली होती. मात्र या आश्वासनाचा सरकारला विसर पडला असून या महामार्गाची अवस्था पूर्वीपेक्षा दयनीय असून प्रवाशांना आठ तासांपेक्षा अधिक वेळ लागत आहेत, असे सांगत काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी सरकारच्या नाकर्तेपणावर नाराजी व्यक्त केली.

navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray Anil Parab
“उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सेनापती…”, फडणवीसांकडून ठाकरे गटाच्या आमदाराचं तोंडभरुन कौतुक
Help to depositors up to one lakh in case of bankruptcy of the credit institution
पतसंस्था बुडाल्यास ठेवीदारांना एक लाखापर्यंत मदत
UP Hathras Stampede News in Marathi
Hathras Stampede : “गर्दी आणि देणगी जमवण्याकरता…”, अटक केलेल्या सेवेकऱ्यांची पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक माहिती!
Thane Traffic Chaos, Mumbai Nashik Highway, Thane Traffic Chaos on Mumbai Nashik Highway, Seven Hour Delays, Roadworks and Heavy Vehicle Load, thane news, marathi news
मुंबई-नाशिक महामार्गावरील कोंडीमुळे नागरिक हैराण, ठाणे ते आसनगाव या दोन तासांच्या अंतरासाठी लागताहेत सात तास
Mumbai Nashik highway, Mumbai Nashik highway Soon Expands to Eight Lanes, Majiwada to Vadape Rapid Road Widening Project, Majiwada to Vadape, reduce traffic Congestion, thane nashik highway,
मुंबई-नाशिक रस्ता लवकरच आठ-पदरी… आव्हाने कोणती? अडथळे काय?
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान
pankaja munde manoj jarange
पंकजा मुंडेंच्या विधान परिषदेच्या उमेदवारीला मनोज जरांगेंचा विरोध? सूचक वक्तव्य करत म्हणाले…

विधानसभेत थोरात यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे मुंबई-नाशिक महामार्गाच्या दुरवस्थेचा मुद्दा उपस्थित केला. पूर्वी या रस्त्याने मुंबईला येण्यासाठी तीन तासांचा कालावधी लागत होता. आता तो सहा ते आठ तासांवर गेला आहे. मागील वर्षी पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न सभागृहात उपस्थित केला होता. त्यावेळेस काही झाले तरी ३१ मार्चपर्यंत या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची ग्वाही देण्यात आली होती. मात्र दुर्दैवाने आज या रस्त्याची अवस्था पूर्वीपेक्षा भयानक असून त्याकडे कोणाचचे लक्ष नसल्याचे थोरात यांनी सांगितले.

हेही वाचा >>>राज्यातील २२ केंद्रांवर ७ जुलै रोजी लेखी परीक्षा

खड्ड्यांचे जाळे’

या महामार्गावर खड्ड्यांचे जाळे पसरले असून वाहनांच्या लांब रांगांचा सामना करावा लागतो. त्यासाठी पर्यायी व्यवस्थाही केली जात नाही. त्यामुळे येणाऱ्या- जाणाऱ्या नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे, हा प्रश्न गंभीर आहे. तातडीने याच्यावर उपाययोजना करून मार्ग काढून वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवावा लागेल, अशी मागणीही त्यांनी केली. थोरात यांच्या या मागणीला नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही सहमती दर्शविली.