मुंबई : सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी सोडवण्यासाठी आता जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत लोकदरबार भरविला जाईल. तसेच अन्य विभागांच्या तक्रारींचेही लोकदरबारात निवारण करण्यात येईल, अशी घोषणा पर्यटनमंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सोमवारी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात लोढा बोलत होते. यावेळी जिल्हा क्रीडा पुरस्काराचेही वितरण यावेळी करण्यात आले. गुणवंत खेळाडू पुरस्कार अक्षय तरळ यांना तर गुणवंत महिला खेळाडू पुरस्कार रुपाली सुनील गंगावणे यांना प्रदान करण्यात आला. अनिल तुळशीराम थोरात यांची गुणवंत क्रीडा मार्गदर्शक म्हणून निवड करण्यात आली.

stolen 1.5 lakh cash from Chitale brothers sweets shop During Diwali
दिवाळीत चितळे बंधू मिठाई विक्री दुकानात चोरी, गल्ल्यातील दीड लाखांची रोकड लंपास
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
Sujay Vikhe Patil Jayashree thorat Sangamner tension
Sangamner News: बाळासाहेब थोरातांच्या मुलीबद्दल बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; सुजय विखेंच्या सभेनंतर संगमनेरमध्ये तणाव
Maharashtra Breaking News Live Updates
Maharashtra News : लोकसभेला मोदींना पाठिंबा देणाऱ्या मनसेला भाजपा विधानसभा निवडणुकीत पाठिंबा देणार? बाळा नांदगावकर म्हणाले….
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Date_ Maharashtra Assembly Election 2024 Date (1)
महाराष्ट्र निवडणुकीत तुम्हीही मतदानासाठी पात्र आहात? मग ‘हे’ तीन अ‍ॅप तुमच्याकडे असलेच पाहिजेत; निवडणूक आयोगानं दिली माहिती!
Maharashtra News Live Update in Marathi| Mumbai Pune Live Updates in Marathi
Maharashtra News : पोलीस निरीक्षकाला साडेतीन लाखांची लाच स्वीकारताना अटक; एसीबीची मोठी कारवाई
harshal pradhan reply to keshav upadhyay article targeting uddhav thackeray
Maharashtra News “मला तेव्हाच यायचं नव्हतं तर पुन्हा कशाला येईन?” मुख्यमंत्रीपदाबाबत उद्धव ठाकरेंचं जाहीर विधान!
Baramati ajit pawar s ncp melava
अजित पवार बारामतीबाबत नक्की काय भूमिका घेणार? राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आज मेळावा

सन्मानचिन्ह, मानपत्र व १० हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याशिवाय महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळ, बृहमुंबई व ठाणे यांच्याकडून मंडळातील सुरक्षा पर्यवेक्षक राजेश व्ही. सावंत, सुरक्षा रक्षक संदीप भेलकर, आर. वी. नायर आणि सहाय्यक सुरक्षा अधिकारी व्ही. बनकर यांना त्यांच्या विशेष कामगिरीसाठी मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मनोज गोहाड, निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल, उपजिल्हाधिकारी तेजस समेळ उपस्थित होते.