नायगाव बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यातील मोठा अडथळा अखेर दूर झाला आहे. येथील इमारत क्रमांक १७ आणि १८ पूर्णपणे रिकाम्या करून घेण्यात म्हाडाच्या मुंबई मंडळाला अखेर यश आले आहे. या दोन इमारतींच्या पाडकामाला गुरुवारपासून सुरुवात करण्यात आली. लवकरच पहिल्या टप्प्यातील उर्वरित इमारती रिकाम्या करून त्यांचे पाडकाम सुरू करण्यात येईल, असे मुंबई मंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा- येत्या २१ नोव्हेंबरपासून पश्चिम रेल्वेवरील १५ डब्बा लोकलच्या २६ फेऱ्या वाढणार

Dharavi Kumbharwada rehabilitation
धारावी कुंभारवाड्याचे मुलुंड कचराभूमीच्या जागेवर पुनर्वसन?; जागा दाखविण्यासाठी नेल्याने रहिवासी संतप्त
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
lokmanas
लोकमानस: महागड्या गृहसंकुलांतही तेच…
people among the Kumbh Mela pilgrims contributed to the resolve traffic jam
गेले संगमस्नानास अन् ओंजळीत वाहतूक नियंत्रणाचे पुण्य!
Kasheli village in Rajapur is the first solar village in the state
राजापुरातील कशेळी गाव राज्यातील पहिले ‘सोलर गाव’
Two quintals of ganja seized in Santnagari Shegaon buldhan newे
बुलढाणा : संतनगरी शेगावात दोन क्विंटल गांजा जप्त, एक आरोपी जेरबंद
mauni amavasya at mahakumbh
मौनी अमावस्या म्हणजे काय? महाकुंभात त्याचे महत्त्व काय?
second phase of action against unauthorized buildings at Agrawal Nagar in Nalasopara also underway on Monday
नालासोपार्‍यातील अनधिकृत इमारतींवर कारवाई, स्थानिकांच्या रोषाचा खासदार, आमदारांना फटका

बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे कार्यादेश जारी करून पाच वर्षे झाली तरी नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. नायगाव येथे ४२ इमारती असून पहिल्या टप्प्यात येथे बांधकाम सुरू करण्यासाठी आवश्यक त्या इमारती रिकाम्या करण्यास मुंबई मंडळाने सुरुवात केली. मात्र रहिवाशांकडून अनेक मुद्द्यांवरून स्थलांतरास विरोध होत होता. दोन इमारती रिकाम्या करून त्यांचे पाडकाम पूर्ण करणे मंडळा शक्य झाले. मात्र इमारत क्रमांक १७ आणि १८ रिकाम्या करण्यात यश येत नव्हते. या इमारतीत पोलीस कुटुंबाचे वास्तव्य होते. आधी पोलिसांना घरे देण्याचे धोरण नसल्याने आणि नंतर धोरण जाहीर झाल्यानंतर कराराचा मुद्दा प्रलंबित असल्याने इमारती रिकाम्या करून घेणे मंडळाला शक्य होत नव्हते. निष्कासनाच्या नोटिसीनंतरही या इमारती रिकाम्या करण्यात येत नव्हत्या.

हेही वाचा- …तर एकपडदा चित्रपटगृह बंद करावी, चित्रपटगृहांच्या मालकांचीच मागणी

आता मात्र मंडळाने सर्व रहिवाशांना स्थलांतरित करून इमारती रिकाम्या करून घेतल्या आहेत. या दोन्ही इमारतींच्या पाडकामाला गुरुवारपासून सुरुवात करण्यात आल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. आता उर्वरित इमारतीही लवकरच पाडून पहिल्या टप्प्यातील इमारतींच्या प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

Story img Loader