मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल रमेश बैस यांची मंगळवारी सकाळी राजभवनावर जाऊन भेट घेतल्याने राजकीय तर्कवितर्क सुरू झाले असून विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या नियुक्त्या होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विधानपरिषद सभापतींची निवडणूकही याच अधिवेशनात गुरुवारी किंवा शुक्रवारी घोषित करण्यात यावी, यासंदर्भातही या भेटीत चर्चा झाल्याचे समजते. मात्र वैनगंगा-नळगंगा प्रकल्पाला लवकरात लवकर मंजुरी मिळावी, याबाबत विस्तृत चर्चा झाल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

हेही वाचा >>> कमला मिलच्या रमेश गोवानी यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक, ६७ कोटी फसवणूक केल्याचा आरोप

चित्रा वाघ, पंकज भुजबळ यांची विधान परिषदेवर वर्णी
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
mahayuti
महायुती सरकारच्या कारभाराचा पंचनामा; महाविकास आघाडीकडून पुस्तिकेच प्रकाशन, ५० हजार कोटींचे घोटाळे झाल्याचा आरोप
varsha gaikwad criticized shinde govt
“लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सूत्रधार गुजरातच्या तुरुंगात, मग…”, बाबा सिद्दीकींच्या हत्येवरून वर्षा गायकवाड यांचा सरकारवर हल्लाबोल!
Onion and grain trade stopped due to market committee strike nashik
कांद्यासह धान्याचे व्यवहार ठप्प; बाजार समिती संपामुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प
shinde shiv sena set up entire system required for modi rally in thane
पंतप्रधानांच्या दौऱ्यावर मुख्यमंत्र्यांची छाप
Hindenburg on Madhabi Puri Buch
‘सेबी’च्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांना संसदेच्या लोकलेखा समितीचे समन्स; हिंडेनबर्गच्या आरोपांची चौकशी होणार?
Navi Mumbai, Naina area, PM Narendra Modi,
नवी मुंबई : नैना क्षेत्रातील २५०० कोटी रुपयांच्या कामाचे पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन

राज्यपालनियुक्त बारा आमदारांच्या नियुक्त्यांचा विषय महाविकास आघाडी सरकारच्या काळापासून वादात अडकला आहे. महाविकास आघाडी सरकाने शिफारस केलेल्या १२ जणांची नियुक्ती तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली नव्हती. यासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका सादर झाली होती. राज्यपालांच्या दिरंगाईबाबत उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करीत राज्यपालांना कर्तव्याची जाणीव करून दिली होती. सर्वोच्च न्यायालयाने या सरकारला नवीन नियुक्त्यांसाठी स्थगिती दिली होती. पण ती काही महिन्यांपूर्वी उठविण्यात आली होती.

हेही वाचा >>> कमला मिलच्या रमेश गोवानी यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक, ६७ कोटी फसवणूक केल्याचा आरोप

आता उच्च न्यायालयात यासंदर्भातील याचिका प्रलंबित असली तरी नियुक्त्यांसाठी स्थगिती नाही. विधानपरिषद सभापतींचे पदही दोन वर्षांपासून रिक्त असून याच अधिवेशनात निवडणूक घेण्याचे सरकारने ठरविले आहे. त्यामुळे बारा आमदार नियुक्त्या व सभापती निवडणुकीसंदर्भातही राज्यपाल भेटीत चर्चा झाल्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी नमूद केले. दरम्यान, विधानपरिषद सभापतींची निवडणूक याच अधिवेशनात व्हावी, अशी मागणी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल बैस यांची भेट घेऊन केली, असे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले.