राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, माजी मंत्री धनंजय मुंडे आणि भाजपा आमदार अतुल भातखळकर यांच्यात विधानसभेत जोरदार खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचा सरकारला अर्थसंकल्पात विसर पडला, असा सवाल धनंजय मुंडेंनी उपस्थित केला होता. पण, ज्यांनी गोपीनाथ मुंडेंच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांना प्रेमाचे उमाळे येत आहेत, असं प्रत्युत्तर अतुल भातखळकर यांनी दिलं आहे.

अतुल भातखळकर बोलताना म्हणाले, “धनंजय मुंडेंना अर्थसंकल्पीय भाषणात आम्ही ज्यांना आयुष्यभर नेते मानलं, अशा स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंची आठवण येत होती. अर्थसंकल्पात मुंडेंचा विसर पडल्याचं ते सांगत आहेत. पण, ज्यांनी जिवंतपणी आमदारकी मिळाल्यानंतर गोपीनाथ मुंडेंच्या पाठीत खंजीर खुपसला, मनस्ताप दिला, त्यांना प्रेमाचे उमाळे येत आहेत. याला पुतणा-मावशीचं प्रेम म्हणतात.”

arvind sawant replied to chandrasekhar bawankule
“उद्धव ठाकरेंना मविआतून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे” म्हणणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळेंना ठाकरे गटाचे प्रत्युत्तर; म्हणाले…
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
MP supriya sule criticize deputy cm ajit pawar in pimpri chinchwad
सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला… म्हणाल्या, “पिंपरी- चिंचवडचा कारभारी वेगळा होता म्हणून…”
bjp minister ravindra chavan target over potholes issues by publish banner on birthday
डोंबिवलीत मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाची टिंगल करणारे फलक लावणाऱ्यांविरुध्द गुन्हा
laxman hake criticized sharad pawar
Laxman Hake : “शरद पवार हे महाजातीयवादी नेते”, आरक्षणाच्या मुद्द्यावरून लक्ष्मण हाके यांची टीका; म्हणाले, “पवार कुटुंबातील व्यक्ती…”
supriya sule on balasaheb thorat cm post statement
Supriya Sule : “राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल”, बाळासाहेब थोरातांच्या विधानावर सुप्रिया सुळेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाल्या…
balasaheb thorat reaction anil bonde remark on rahul gandhi
अनिल बोंडे यांचे बोलविते धनी भाजपचे नेते, त्यांचे वक्तव्य म्हणजे नथुराम गोडसे प्रवृत्ती – बाळासाहेब थोरात यांच्याकडून संताप व्यक्त
Vijay Wadettiwar and Sanjay Gaikwad
गायकवाड यांना वडेट्टीवार यांचे प्रत्युत्तर ,म्हणाले ‘पन्नास खोके घेणाऱ्यांना सत्तेची मस्ती’

हेही वाचा : “…म्हणून भूषण देसाईंनी शिंदे गटात प्रवेश केला”, वैभव नाईक यांचा दावा

धनंजय मुंडेंनी भातखळकरांच्या भाषणावर हरकत घेतली. ते म्हणाले, “भातळखरांनी माझं नाव घेतलं, माझ्यावर आरोप केला, त्याला हरकत आहे. भातखळकरांना माझा राजकीय प्रवास माहिती आहे. मी मुंडे साहेबांचा पुतण्या आहे. पंडीत आण्णांचा चिरंजीव आहे. मी पाठीत खंजीर खुपसला नाही. ११ जानेवारी २०१२ ला मला आणि माझ्या वडिलांना पक्षातून काढत, रक्ताचं नातं तोडण्याची घोषणा झाली.”

“मुंडे साहेबांच्या पाठीत कोणी-कोणी खंजीर खुपसला याचं सर्वजण साक्षीदार आहेत. दहा वर्ष त्याच संघर्षातून येथे आलो आहे. त्यामुळे व्यक्तीगत आरोप करू नये,” असा सल्ला धनंजय मुंडेंनी दिला.

हेही वाचा : वैभव नाईकांची जिल्हाप्रमुख पदावरून उचलबांगडी; शिंदे गटात प्रवेश करणार? मुख्यमंत्री म्हणाले, “ते रोज मला…”

यावर अतुल भातखळकर यांनी म्हटलं, “कितीही नाटकी पणाने बोलला तर महाराष्ट्र फसणार नाही. अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांना बाजूला सारून तुम्हाला आमदार केलं. तरी गोपीनाथ मुंडेंना मनस्ताप देण्याचं काम तुम्ही केलं, ही वस्तुस्थिती आहे.”