नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी मंत्रिपदाचा गैरवापर केल्याने त्यांच्याविरुध्द फौजदारी कारवाई करून त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे, अशी मागणी भाजप नेते डॉ. किरीट सोमय्या यांनी राज्यपालांकडे केली आहे.
विवाहाचा खर्च कंत्राटदाराने केला आहे, अशी माहिती जाधव यांनी प्राप्तिकर विभागाला दिली आहे. तो सरकारी कंत्राटदार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. जाधव यांनी गेल्या दोन वर्षांत प्राप्तिकर विवरणपत्रेही दाखल केलेली नाहीत. त्यांनी २००९ मध्ये निवडणुकीच्या वेळी दिलेल्या संपत्तीच्या विवरणानुसार विवाहात केलेला खर्च अफाट असून हा मंत्रिपदाचा गैरवापर आहे. त्यामुळे फौजदारी दंडसंहिता आणि लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींनुसार जाधव यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.
प्राप्तिकर विभागाने चौकशी सुरू केल्याने जाधव यांना पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नसून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do action on bhaskar jadhav kirit somaiya