हिरानंदानी हॉस्पिटलमधील मूत्रपिंड चोरी प्रकरणानंतर एकंदर डॉक्टरी पेशावर पुन्हा एकदा संशयाचे ढग जमा होत आहेत. मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी जमेल तो मार्ग अवलंबणारे रुग्ण व त्यांचे आप्तेष्ट आणि या परिस्थितीचा फायदा घेत समाजातील नैतिकता पायदळी तुडवून पोटे भरणारे दलाल यातून मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची प्रक्रिया बाधित झाली आहे. मात्र, सध्या या प्रकरणाचे खापर सर्वस्वी वैद्यकीय पेशावर फोडण्यात येत असल्याची भावना मूत्रपिंडतज्ज्ञ व मूत्रपिंड शल्यचिकित्सकांमध्ये आहे. आता असल्या शस्त्रक्रियाच बंद करण्याच्या निर्णयापर्यंत ते आले आहेत, तर मुख्यमंत्र्यांनीही डॉक्टरांनी शस्त्रक्रिया बंद केल्यास कारवाईचे संकेत दिले आहेत. त्यामुळे या परिस्थितीवर काय तोडगा काढता येईल व डॉक्टरांची नेमकी बाजू काय याबाबत ‘लोकसत्ता मुंबई’ने ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’च्या नैतिकता समितीचे माजी समन्वयक डॉ. अरुण बाळ यांच्याशी केलेली ही खास बातचीत..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा