जालना, औरंगाबादमधून मुंबईत आलेल्या दुष्काळग्रस्तांच्या भावना
गावाकडे शेतीवाडी आहे, घर आहे, जिव्हाळय़ाची माणसं आहेत, पण तरीही त्यांची गावी परतण्याची इच्छा नाही. कारण फक्त एकच- पाण्याचे दुर्भिक्ष. ‘‘गावाकडं पानी न्हाई, चाळीस रुपयांत पाण्याचा ड्रम भेटायला रोज नाय परवडत, म्हून आता आम्हांला परत जायचं नाय’’, अशा शब्दांत मुंबईत राहत असलेल्या दुष्काळग्रस्तांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दुष्काळाने होरपळलेले औरंगबाद, जालना अशा मराठवाडय़ातील अनेक भागांतील ग्रामस्थ कुटुंबांसह मुंबईत दाखल झाले आहेत. इथे मिळेल त्या मोकळय़ा जागेवर त्यांच्या झोपडय़ा उभ्या राहिल्या आहेत. पावसाळय़ापूर्वी निघणाऱ्या मुंबई महापालिकेच्या नालेसफाईच्या कामांचा रोजगार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे पाणी मिळतंय.. अशा परिस्थितीमुळे मराठवाडय़ातील दुष्काळग्रस्त आता मुंबईतच राहण्याच्या मन:स्थितीत पोहोचले आहेत. गाव दुरावण्याचं दु:ख त्यांना जरूर आहे, पण त्याहीपेक्षा मोठं समाधान कुटुंबाच्या दोन वेळच्या जेवणपाण्याची सोय होण्याचं आहे. १९७२ च्या भीषण दुष्काळानंतर चेंबूर भागात जालना, औरंगाबाद येथून आलेल्या दुष्काळग्रस्तांनी आपल्या वस्त्या वसवल्या होत्या, याच वस्त्या आता पुन्हा नव्याने भरू लागल्या असून मराठवाडय़ातून व विशेषत: जालना, औरंगाबाद, परभणी येथून येथे दुष्काळग्रस्त येऊ लागले आहेत. यामध्ये गरीब, मजूर, शेतकरी व बहुजन समाजातील कुटुंबांचे प्रमाण जास्त आहे. अशाच वस्त्यांमध्ये फिरून तेथील परिस्थितीचा घेतलेला आढावा..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा