मुंबई : आर्थिक घोटाळ्यातील २० झोपडपट्टी पुनर्वसन योजनांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बजावलेला स्थगिती आदेश अखेर मागे घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत केंद्र सरकारला विनंती केली होती. त्यानंतर हा स्थगिती आदेश मागे घेत असल्याचे पत्र संचालनालयाने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला पाठविले आहे.

झोपु योजनेसाठी बॅंकेकडून कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेऊन ती रक्कम अन्यत्र वळविण्यात आल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी सुरू आहे. प्रामुख्याने दिवाण हौसिंग फायनान्स लिमिटेडने या योजनांना कर्जपुरवठा केला असून त्यात घोटाळा असल्याप्रकरणी चौकशी सुरू आहे. या सर्व प्रकल्पात ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचे आदेश मे २०२०मध्ये सक्तवसुली संचालनालयाने दिले होते. यामुळे या योजना ठप्प झाल्या होत्या. त्याचा फटका झोपडीवासीयांना बसला होता.

new water purification project, water purification Bhandup Complex, Mumbai,
मुंबई : भांडूप संकुलातील नव्या जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या कामला सुरुवात, जुन्या प्रकल्पाचे आयुर्मान संपुष्टात
18th October 2024 Horoscope In Marathi
१८ ऑक्टोबर पंचांग: नोकरदारांच्या कुंडलीत अच्छे दिन तर…
Abhay Yojana to regularize buying and selling transactions of slum dwellers in Mumbai Thane news
मुंबई-ठाण्यातील झोपडीधारकांना दिलासा; खरेदीविक्री व्यवहार नियमित करण्यासाठी अभय योजना
धारावीकरांसाठी देवनारमध्येही भूखंड; क्षेपणभूमीची १२५ एकर जागा देण्याचा राज्य सरकारचा निर्णय
Why new housing project without water
पुणे : पाण्याविना नवीन गृहप्रकल्प कशासाठी?
N M Joshi Marg BDD Redevelopment Project speed of construction of 1260 houses in the first phase
पहिल्या टप्प्यातील १,२६० घरांच्या बांधकामाला वेग, ना. म. जोशी मार्ग बीडीडी पुनर्विकास प्रकल्प
Objection notice submitted by consumer panchayat on housing policy regarding ownership of Zopu plot Mumbai news
झोपु भूखंडाची मालकी विकासकांना देण्यास विरोध! गृहनिर्माण धोरणावर ग्राहक पंचायतीकडून हरकती-सूचना सादर
state government aims to complete stalled slum redevelopment schemes and plans to fine developers
झोपु योजना रखडल्यास, विकासकांना ‘चटईक्षेत्रफळा’चा दंड!

हेही वाचा >>> आरेतील १७७ झाडांवर कुऱ्हाड, कडक पोलीस बंदोबस्तात पहाटे आरेत वृक्षतोड

भाडे बंद आणि झोपडी तुटलेली अशा अवस्थेतील झोपडीवासीय अक्षरश: रस्त्यावर आले आहेत. अशा वेळी या झोपडीवासीयांच्या किमान पुनर्वसनावरील स्थगिती उठविण्याची विनंती फडणवीस यांनी सक्तवसुली संचालनालयाला पत्र पाठवून केली होती. हा विषय त्यांनी लावून धरला होता. आमदार अमित साटम यांनी विचारलेल्या प्रश्नाला विधिमंडळात उत्तर देतानाही फडणवीस यांनी पुनर्वसनावरील स्थगिती उठविण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे नमूद केले होते.

हेही वाचा >>> Maharashtra News Live : भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्यातील गैरव्यवहारप्रकरणी संजय राऊतांनी ठोठावलं सीबीआयचं दार

पंतप्रधान कार्यालयासोबतच्या उच्चस्तरीय बैठकीतही हा प्रश्न उपस्थित झाला होता. आता अखेरीस ही स्थगिती उठल्याचे पत्र सक्तवसुली संचालनालयाचे उपसंचालक डॉ. आकाश श्रीखंडे यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांना पाठविले आहे. या पत्राची प्रत ‘लोकसत्ता’कडे आहे. या पत्रात म्हटले आहे की, झोपडीवासीयांचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. प्राधिकरणाने या योजनांवरील निर्णय प्रक्रिया सुरू करावी व त्याबाबतची माहिती वेळोवेळी संचालनालयाला द्यावी. सक्तवसुली संचालनालयाने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून  या योजनांना परवानगी द्यावी, असे म्हटले आहे.