राज्यातील २३५९ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. त्यामध्ये भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी जोरदार मुसंडी मारली आहे. तर, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पिछेहाट झाली आहे. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

“फक्त टोमणे, आरोप-प्रत्यारोपात वर्ष घालवले. ज्यांनी मतदारांशी आणि बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली, त्यांना लोकांनी नाकारलं आहे. मतदारांशी प्रतारणा केलेल्यांना जनतेनं घरी बसवलं. असेही घरी बसण्याची सवय त्यांना होतीच,” असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

bjp want ajit pawar to contest elections separately jayant patil claim
‘अजित पवारांना स्वतंत्र लढण्याचा सल्ला’; जयंत पाटील यांचा दावा
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
NRC application for adhar card
आसाममध्ये आधार कार्ड बनवण्यासाठी नवा नियम; मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमांनी केली मोठी घोषणा; म्हणाले…
mira Bhayandar municipal corporation, Chhatrapati shivaji maharaj statue, inauguration
भाईंदर मधील शिवरायांचा पुतळा उद्घाटनाच्या प्रतीक्षेत! मुख्यमंत्र्यांना वेळच मिळेना
shivsena thackaray
“पंतप्रधान मोदी ज्याला हात लावतात, ती वास्तू…”; शिवरायांचा पुतळा कोसळण्यावरून ठाकरे गटाचं टीकास्र; मुख्यमंत्र्यांनाही केलं लक्ष्य!
cm Eknath shinde
कामचुकार ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे, मुंबई – गोवा महामार्गाच्या पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांचे निर्देश
PM Modi participate in Lakhpati Didi Sammelan at Jalgaon
मुख्यमंत्र्यांच्या मागण्यांकडे पंतप्रधानांचे दुर्लक्ष; शेतकऱ्यांविषयी प्रश्नांबाबत भाषणात अवाक्षरही नाही
ubt chief uddhav thackeray slam maharashtra government over badlapur incident
विरोधकांचे आंदोलन; भाजपचा जागर; आरोपीला पाठीशी घालण्याचे काम – ठाकरे

हेही वाचा : “इंडिया आघाडीवर मंथन करणे गरजेचे”; नितीश कुमार आणि ओमर अब्दुल्लांच्या ‘त्या’ वक्तव्यांवर ठाकरे गटाची उघड नाराजी!

“ग्रामपंचायत निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर महायुतीला मतदारांनी कौल दिला आहे. यासाठी मतदारांचे आभार मानतो. गेल्या वर्षभराच्या कालावधीत विकासकामे आणि महाविकास आघाडीनं थांबवलेल्या प्रकल्पांना चालना देण्याचं काम आम्ही केलं. सर्वांगीण विकास करण्याचं धोरण आम्ही आखलं. राज्यातील शेतकरी, उद्योजक, महिला, तरूण, कामगारांना न्याय देण्याचं काम आमच्या सरकारनं केलं. ‘शासन आपल्या दारी’ योजना राबवण्यात आली,” असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

हेही वाचा :  लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढविणार- मुख्यमंत्री

“महाविकास आघाडीपेक्षाही अधिक सरपंच आणि सदस्य महायुतीचे निवडून आले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्र्यांनी जनतेला न्याय देण्याचं काम केलं,” असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.