मुंबई: राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थितीचा स्थानिक स्वराज्य संस्थाप्रमाणेच सहकारी संस्थांनाही मोठा फटका बसू लागला आहे. राज्य सरकारच्या सततच्या हस्तक्षेपामुळे राज्यातील सुमारे ३९ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका गेल्या वर्ष-दीड वर्षापासून रखडल्या आहेत.

आधी लोकसभा निवडणुकीचे कारण पुढे करीत या निवडणुकांना स्थगिती देणाऱ्या राज्य सरकारने पुन्हा पावसाचे कारण पुढे करीत या निवडणुकांना ३० सप्टेंबरपर्यंत स्थगिती दिली आहे. त्यामुळे या संस्थांच्या निवडणुका आता विधानसभा निवडणुकीनंतरच म्हणजेच पुढील वर्षी होण्याची शक्यता सहकार विभागातील सूत्रांनी व्यक्त केली आहे.

Maharashtra State Government opinion in High Court regarding appointment of MLA print politics news
स्थगिती नसल्यानेच आमदारांच्या नियुक्त्या; राज्य सरकारची उच्च न्यायालयात भूमिका
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
seven MLA, High Court, Maharashtra Government,
स्थगिती नसल्यानेच सात आमदारांच्या नियुक्त्या, राज्य सरकारची उच्च न्यायालयात भूमिका
pimpri chinchwad municipal corporation
पिंपरी : प्रशासकीय राजवटीत विकासकामे सुसाट; दसऱ्यादिवशीही स्थायीची बैठक
trade stop due to the closure of the market committees in West varhad
अकोला: बाजार समित्या बंद! कोट्यवधींचे व्यवहार ठप्प…
Onion and grain trade stopped due to market committee strike nashik
कांद्यासह धान्याचे व्यवहार ठप्प; बाजार समिती संपामुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प
constitution for urban self government
संविधानभान : शहरी स्थानिक स्वराज्य संस्था
aibea urged fm sitharaman to fill 60 vacant posts of directors of boards in 12 psbs
सरकारी बँकांत ३२ टक्के संचालकांच्या जागा नियुक्तीविना, कर्मचारी,अधिकाऱ्यांच्या प्रतिनिधींच्या सर्व २४ जागा दशकभरापासून रिक्त

राज्यात ३१ डिसेंबर २०२३ अखेर निवडणुकीस पात्र असलेल्या ९३,३४२ सहकारी संस्थांपैकी ५०,२३८ संस्थांची निवडणूक पूर्ण झाली आहे. तर निवडणूक प्रक्रिया सुरू असलेल्या सहकारी संस्थांची संख्या १०,७८३ आहे. याशिवाय निवडणूक प्रक्रिया सुरूच झालेली नाही अशा २०,१३० तर चालू वर्षी निवडणुकीस पात्र ८,३०५ अशा एकूण ३८,७४० संस्थांची निवडणूक प्रक्रिया रखडली आहे. मार्च-एप्रिल दरम्यान सहकार निवडणूक प्राधिकरणाने या संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केला होता. मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने या निवडणुका पुढे ढकलण्याची सूचना सहकार निवडणूक प्राधिकरणास केली. त्यामुळे निवडणुका ३१ मेपर्यंत पुढे ढकलल्या होत्या. मात्र अवघ्या आठवडाभरातच सरकारने पुन्हा या निवडणुका स्थगित करण्याचे आदेश निवडणूक प्राधिकरणास दिले आहेत. याबाबतचा आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे यांनी प्रसृत केला आहे.

हेही वाचा >>>सकाळी ९ नंतर शाळा सुरू करण्याच्या शासन निर्णयाला बगल ?

शेतकऱ्यांच्या अडचणी

राज्यात सर्वत्र पाऊस सुरू असून शेतकरी खरीप हंगामातील पेरणी, पीक लागवड आणि शेतीच्या कामात व्यग्र आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना ते सभासद असलेल्या संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यास येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन या निवडणुका ३० सप्टेंबरपर्यंत स्थगित करण्याचे आदेश सहकार विभागाने गुरुवारी दिले. विशेष म्हणजे राज्यात सप्टेंबरपासून विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार असल्यामुळे या सहकारी संस्थांच्या निवडणुका आता पुढील वर्षापर्यंत लांबणीवर पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.