लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून अंधेरी – कुर्ला मार्गावर फेरीवाल्यांची संख्या वाढली असून महानगरपालिकेने या मार्गावर तयार केलेल्या संपूर्ण पदपथावरच फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. इतकेच नव्हे तर रस्त्यावरील दोन मार्गिकाही फेरीवाल्यांनी काबीज केल्या आहेत. फेरीवाल्यांनी या परिसरात पथाऱ्या पसरून नागरिकांचा रस्ता अडवला आहे. त्यामुळे येथील नागरिक कमालीचे संतप्त झाले आहेत.

Jewellery worth more than three lakh rupees seized from suspected vehicles in Bhiwandi
भिवंडीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई, संशयित वाहनांतून तीन लाखाहून अधिक रुपयांचे दागिने जप्त
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
Nashik State Transport Department will run extra bus during diwali
दिवाळीसाठी नाशिक विभागाकडून जादा बससेवा
Funds to Urban Development Department for Construction of Elevated Road of Rustamji Urbania Housing Complex thane news
रुस्तमजी अर्बेनिया गृहसंकुलाच्या उन्नत मार्गाच्या हालचालींना वेग
Congestion at Chitnis Park Chowk raises safety concerns for New English Medium School students
गजबजलेला चौक, वर्दळीचा रस्ता अन् विद्यार्थ्यांची घरी जाण्यासाठी घाई, न्यू इंग्लिश शलेसमोरील दृश्य…
implementation of hawkers policy stalled for ten years
विश्लेषण : मुंबईत फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी दहा वर्षे का रखडली? मुजोर फेरीवाल्यांना ‘राजकीय आशिर्वाद’?
Pune driving opposite direction, driving in the opposite direction,
पुणे : विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्या बेशिस्तांवर कडक कारवाई
Vasai, car dealers and garages, Roads Vasai,
वसई : वाहन विक्रेते व गॅरेज वाल्यांकडून रस्ते गिळंकृत, रस्त्यावरच वाहन विक्रीचा बाजार व दुरुस्ती; वाहतुकीला अडथळे

मुंबईत सर्वत्र पुन्हा एकदा फेरीवाल्यांची संख्या वाढल्याची तक्रार नागरिक समाज माध्यमांवर करीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून अंधेरी – कुर्ला मार्गावरील फेरीवाल्यांच्या संख्येत बेसुमार वाढ झाली आहे. स्थलांतरीत फेरीवाल्यांनीही मुंबईतील रस्ते व्यापले आहेत. याबाबत सामाजित कार्यकर्ते पिमेंटा गॉडफ्रे यांनी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे तक्रार केली आहे.

आणखी वाचा-रजोनिवृत्तीबाबतच्या जागरूतीसाठी महिलांनी पुढाकार घ्यावा, ९१ टक्के पुरुषांचे मत

महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याशिवाय फेरीवाल्यांची संख्या इतकी वाढणे शक्य नाही, असा आरोप पिमेंटा गॉडफ्रे यांनी या पत्रात केला आहे. जे. बी. नगर येथे दर शनिवार बाजार भरतो. त्यावेळी फेरीवाल्यांच्या गर्दीतून वाट काढत चालणेही पादचाऱ्यांना मुश्कील होते. फेरीवाल्यांनी संपूर्ण पदपथ व्यापला असून आता अनेक फेरीवाल्यांनी रस्त्यावरही पथाऱ्या पसरल्या आहेत. त्यामुळे वस्तू विकत घेणाऱ्यांची गर्दीही वाढत आहे. यामुळे अंधेरी – कुर्ला मार्गावरील दोन मार्गिका वाहनांसाठी उरल्याच नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे. या रस्त्यावरून एका वेळी एकच गाडी जाऊ शकेल इतकीच जागा उरली आहे.

महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना फेरीवाल्यांची जास्त काळजी असल्याचा आरोप पिमेंटा यांनी केला आहे. महानगरपालिका प्रशासनाने प्राधान्य कशाला द्यायचे ते ठरवावे. रस्ते पादचाऱ्यांसाठी आहेत की फेरीवाल्यांसाठी याचे धोरण ठरवावे, असेही ते म्हणाले.