मुंबई : राज्यातील पर्यावरणदृष्ट्या संवेदनाक्षम भागातील गृहप्रकल्पांना केंद्रीय पर्यावरण विभागाने दिलेली मंजुरी आता विभागता येणार आहे. मात्र यासाठी तज्ज्ञ देखरेख समितीची मान्यता बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे रखडलेल्या गृहप्रकल्पांना होणारा विलंब टळला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मु्ंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे या शहरांसह राज्यातील आदी पर्यावरणदृष्ट्या संवेदनक्षम भागातील गृहप्रकल्पांना केंद्रीय पर्यावरण विभागाची परवानगी बंधनकारक असते. या शिवाय संबंधित प्रकल्पाला स्थानिक नियोजन प्राधिकरणाकडून मंजुरी दिली जात नाही. केंद्रीय पर्यावरण विभागाकडून परवानगी मिळविण्यासाठी मोठा कालावधी लागतो. यांचे कारण म्हणजे या विभागाकडून पर्यावरणाची हानी रोखण्याच्या दृष्टिकोनातून प्रामुख्याने विचार केला जातो. वेगवेगळे तज्ज्ञ या समितीवर असतात. तिवरांची हानी रोखणे वा ठाणे खाडीलगतचा फ्लेमिंगोचा वावर यासारख्या अनेक घटकांचा या परवानग्या देताना विचार केला जातो. याआधी अशा रीतीने संबंधित गृहप्रकल्पात मिळालेली परवानगी अन्य विकासकाला फक्त ना हरकत प्रमाणपत्र देऊन हस्तांतरित करता येत होती. त्यामुळे नवा विकासक या पर्यावरण परवानगीत काही वेळा परस्पर बदलही करत होता वा या परवानगीचा आपल्या पद्धतीने सोयीचा अर्थ लावत होता.

Vellore, Reliance projects, Ratnagiri, employment,
रत्नागिरीत येणारे वेल्लोर आणि रिलायन्स प्रकल्प प्रदूषण विरहित; २० हजारांपेक्षा अधिक बेरोजगारांना मिळणार रोजगार – उदय सामंत
18th October 2024 Horoscope In Marathi
१८ ऑक्टोबर पंचांग: नोकरदारांच्या कुंडलीत अच्छे दिन तर…
Objection notice submitted by consumer panchayat on housing policy regarding ownership of Zopu plot Mumbai news
झोपु भूखंडाची मालकी विकासकांना देण्यास विरोध! गृहनिर्माण धोरणावर ग्राहक पंचायतीकडून हरकती-सूचना सादर
Investigating land fragmentation projects letter of MHADA  a committee has been formed by the Nashik district administration
भूखंडाचे तुकडे करणाऱ्या प्रकल्पांची चौकशी; ‘म्हाडा’च्या पत्रानुसार नाशिक जिल्हा प्रशासनातर्फे समिती स्थापन
maharashtra govt announces key decisions ahead of elections 40000 crore for key projects in mumbai and thane
मुंबई, ठाणेकरांना टोलचा आणखी भुर्दंड; वित्त विभागाच्या आक्षेपानंतर ४० हजार कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी
Action of Maharashtra Pollution Control Board against MIDC for pollution of water source in Kurkumbh area Pune print news
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा एमआयडीसीला दणका! कुरकुंभ परिसरातील जलस्रोत प्रदूषित केल्याप्रकरणी कारवाईचे पाऊल
Textile project of Reliance in Palghar
पालघरमध्ये रिलायन्सचा वस्त्रोद्याोग प्रकल्प; जमिनीच्या हस्तांतरासाठी एमआयडीसीचा अर्ज, दर मात्र गुलदस्त्यात
Koradi Power Generation Project, Koradi,
वीज निर्मिती प्रकल्पावरून सरकार व पर्यावरणवाद्यांमध्ये जुंपणार, ‘हे’ आहे कारण

हेही वाचा >>> मुंबई : आर्थिक घोटाळ्यातील सर्व झोपु प्रकल्पांवरील स्थगिती ‘ईडी’कडून मागे!

नव्या सुधारणेमुळे आता एखाद्या गृहप्रकल्पात विकासक बदलण्यात आला वा आणखी काही विकासक संबंधित प्रकल्पाशी जोडले गेले तर सर्वांना ते बंधनकारक असावे, यासाठी प्रकल्पात काहीही बदल झाला तरी पूर्वी घेतलेली व लागू असलेली पर्यावरण विषयक मंजुरी बदल झालेल्या गृहप्रकल्पासाठी वापरताना पुन्हा तज्ज्ञ समितीकडून मंजूर करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे नव्याने पर्यावरण मंजुरी घेण्यासाठी वागणारा कालावधी कमी होणार आहे. त्याचा रखडलेल्या गृहप्रकल्पांना फायदा होणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

हेही वाचा >>> मुंबई : योगा प्रशिक्षकाचा मृत्यू, आत्महत्या केल्याचा संशय

केंद्रीय पर्यायवरणाचा हा निर्णय आवश्यक होता. पूर्वी तज्ज्ञ समितीच्या परवानगीशिवाय पर्यावरण मंजुरी हस्तांतरित करता येत होती. परंतु आता विकासक अनेक भागीदारांना बेकायदेशीररीत्या प्रकल्पात सामावून घेतात. परंतु पर्यावरण मंजुरीच्या उल्लंघनाचा प्रश्न उपस्थित होतो तेव्हा एकमेकांकडे बोट दाखवून मोकळे होतात. आता या नव्या सुधारणेमुळे प्रत्येकाची जबाबदारी निश्चित होईल. त्यामुळे पर्यावरण नियंमांचे उल्लंघन करून प्रकल्प रखडविण्याच्या प्रकारांना आळा बसेल.

– ॲड. आदित्य प्रताप, ॲडव्होकेट, राष्ट्रीय हरित लवाद

हा प्रकार म्हणजे पर्यावरण मंजुरीसाठी आणखी एक टेबल वाढविण्याचा प्रकार आहे. मुळात पर्यावरण मंजुरी हाच एक फार्स आहे. सुरुवातीला ठरलेल्या नियमाच्या चौकटीत राहून पर्यावण मंजुरी घेतली जाते व नंतर वाट्टेल ते बदल करून त्यासाठी नव्याने मंजुरी घेतली जाते. याआधी पर्यावरण मंजुरी दिलेली आहे असा मुद्दा पुढे केला जातो. त्यामुळे पर्यावरण मंजुऱ्यांसाठी तज्ज समितीकडून मान्यता ही बाब एक टेबल वाढविण्याचीच प्रकार आहे. उलटपक्षी पर्यावरणाची हानी होणार नाही याबाबत काळजी घेतली जाते का, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

– चंद्रशेखर प्रभू, वास्तुरचनाकार