मुंबई : पावसामुळे जोगेश्वरी परिसरातील बैठ्या घरांतील नागरिकांचे व दुकानदारांचे बुधवारी प्रचंड नुकसान झाले असून या परिसरातील रहिवाशांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी माजी नगरसेवक अनंत नर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. मजास नाला दुथडी भरून वाहू लागल्यामुळे या परिसरातील घरात व दुकानात मोठ्या प्रमाणावर पाणी शिरून लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा >>> तृतीयपंथीयाशी प्रेमसंबंध असल्याचे समजताच पत्नीनं मागितला घटस्फोट, पतीनं पत्नीच्या चेहर्‍यावर ॲसिड फेकलं

seven women burnt by firecrackers during Ganpati immersion in umred
Video : फटाक्यामुळे ७ महिला भाजल्या, नागपुरातील उमरेडमध्ये गणपती विसर्जन मरवणुकीतील दुर्घटना
26th September Rashi Bhavishya & Panchang
२६ सप्टेंबर पंचांग: दिवसाच्या सुरुवातीला ‘या’ राशींना होणार…
person who stole jewellery from devotees was arrested in Lalbagh
लालबागमध्ये भाविकांचे दागिने चोरणाऱ्याला अटक, आरोपी सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी
Due to lack of fitness certificates thousands of vehicles are stuck affecting transportation of essential goods Mumbai news
फिटनेस प्रमाणपत्रे नसल्याने हजारो वाहने अडकली; अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीवर परिणाम
municipal administration started temporary repairs on ghodbandar flyover and inspection of roads
ठाणे : कोंडीनंतर अधिकाऱ्यांना जाग, उड्डाणपुलांलगत तात्पुरती दुरूस्ती, रस्त्यांच्या पाहाणीला सुरूवात
yavatmal water pipe line scam marathi news
यवतमाळ जिल्ह्यातील जलवाहिनी घोटाळाः उच्च न्यायालयाकडून चौकशीचे संकेत…
thane passengers suffer financial loss
एसटी अचानक रद्द झाल्यामुळे प्रवाशांना आर्थिक भूर्दंड, संपाचा परिणाम प्रवाशांच्या पथ्यावर
Nashik compensation land, Farmers Action Committee Nashik,
नाशिक : जागेचा मोबदला न मिळाल्यास रस्त्यांवर नांगर – मनपा आयुक्तांना शेतकरी कृती समितीचा इशारा

मुंबईत ठिकाठिकाणी सखल भागात बुधवारी पाणी भरले. काही तासातच अनेक भाग जलमय झाले. पूर्व आणि पश्चिम उपनगरात सर्वाधिक पाऊस पडला. पश्चिम उपनगरात सर्वाधिक पाऊस अंधेरी पूर्व, मरोळ, जोगेश्वरी पूर्व या भागात झाला. त्यातच जोगेश्वरी पूर्वेकडी मजास नाला दुथडी भरून वाहू लागला. त्यामुळे नाल्याच्या जवळ राहणारे नागरिक, दुकानदार यांच्या घरांमध्ये व दुकानात मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले. त्यामुळे त्यांचे अतोनात हाल झाले व नुकसान झाले.

हेही वाचा >>> Mumbai Local Train Updates : पावसामुळे १०० लोकल फेऱ्या रद्द; मेल-एक्स्प्रेस आठ तास खोळंबल्या

रहिवासी, दुकानदार मध्यमवर्गातील असून त्यांना हे नुकसान परवडणारे नाही. त्यामुळे त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अनंत नर यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून केली आहे. जोगेश्वरी पूर्व विभागात मेघवाडी, आदर्शनगर, गोणीनगर, टिळकवाडी, दवे कंपाऊंड, गांधीनगर, अंबिकानगर, महाराज भुवन, न्यु शामनगर येथील नाथ पै चौक, नवलकर मार्केट, चाचनगर, फ्रान्सिसवाडी आणि बांद्रेकरवाडी या ठिकाणी दुकानातील व घरातील सामान पाण्याखाली गेले होते. अनेकांनी आपल्या दुकानातील ओलाचिंब झालेला माल गुरूवारी रस्त्यावर आणून टाकला होता. त्यांच्या नुकसानाची पाहणी करून शासनाकडून त्यांना तातडीची मदत करावी, अशी मागणी नर यांनी पत्राद्वारे केली आहे.