लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : राज्यात दिवसेंदिवस पावसाचा जोर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान खात्याने रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा (रेड अलर्ट) इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाने महाड, पोलादपूर, माणगाव, तळा, रोहा, सुधागड – पाली या तालुक्यांमधील सर्व माध्यमाच्या सरकारी व खासगी शाळा आणि महाविद्यालयांना गुरूवार, २५ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थीहित लक्षात घेता व संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या गुरूवार, २५ जुलै रोजी सकाळी आणि दुपारच्या सत्रात रायगड जिल्ह्यातील संबंधित तालुक्यात होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

medical college, Maharashtra ,
नव्याने मंजूर वैद्यकीय महाविद्यालयात चालू सत्रातच प्रवेश, राज्यात एमबीबीएसच्या ८०० जागा…
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
Fake IAS officer arrested in Solapur
सोलापुरात तोतया आयएएस अधिकाऱ्यास अटक; नोकरीचे आमिष दाखवून गंडा
Badlapur accused police custody, Badlapur accused,
गुन्ह्याच्या अधिकच्या तपासासाठी बदलापूर आरोपींचा पोलिसांकडे ताबा
Union Ministry of Health and Family Welfare approved eight Government Medical Colleges in Maharashtra
राज्यात आठ नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता! एमबीबीएसच्या ८०० जागा वाढल्या…
headmaster, schools, Education Department,
गुरूवारी मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर; हवामान विभागाच्या रेड अलर्टनंतर प्रशासनाचा निर्णय
High Court order to hold AGM election of registered graduate group of Mumbai University on 24th September
अधिसभेमुळे सरकारची शोभा, निवडणूक स्थगितीबद्दल न्यायालयाची चपराक; मंगळवारी मतदान
teachers unions mass leave on wednesday zilla parishad schools closed march to collectors office
बदलापूर: बुधवारी जिल्हा परिषद शाळा बंद शिक्षक संघटनांची सामूहिक रजा, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

आणखी वाचा-मुंबईतील पाणी कपात येत्या सोमवारपासून मागे घेणार

रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूर, माणगाव, तळा, रोहा, सुधागड – पाली या तालुक्यांमध्ये रात्रीपासून अतिवृष्टी झाल्याने व समुद्रास आलेल्या भरतीमुळे कुंडलिका, अंबा व सावित्री या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाने या तालुक्यांमधील सर्व माध्यमाच्या सरकारी व खासगी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय व कोणतीही अडचण निर्माण होऊ नये म्हणून मुंबई विद्यापीठ प्रशासनानेही या तालुक्यातील सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत, असे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. पूजा रौंदळे यांनी स्पष्ट केले.