निरीक्षणासाठी मुंबईतील खगोल अभ्यासकांची ग्रामीण भागात धाव
खगोलीय घटनांची पर्वणी अनुभवणाऱ्या हौशी आकाश निरीक्षकांपासून मुंबई शहर आता कायमचे दुरावले आहे. कारण, मुंबईसह देशातील अन्य महानगरांमध्ये प्रकाश प्रदूषणाचा टक्का कमालीचा वाढल्याने येथून आकाश निरीक्षण करणे अशक्य झाले आहे. मुंबईतील अनेकांनी लांबची स्थळे निरीक्षणासाठी गाठली खरी, मात्र तेथेही विकास होत असून एकंदरीत आकाश निरीक्षण दुरापास्त झाल्याने मुंबईकर खगोल अभ्यासकांची हिरमोड होत आहे.
खगोलीय घटनांच्या अनेक शोधांनी जगातील अंधश्रद्धा मोडीत निघाल्यावर या शास्त्राला महत्त्व निर्माण झाले. यातून, अवकाशस्थ वस्तूंचा, ग्रह-ताऱ्यांचा अभ्यास सुरू झाला.
मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील प्रकाश प्रदूषणामुळे हा अभ्यास करणे मुश्कील झाले असून सध्या असे निरीक्षण करण्याची शहरात संधी नसल्याचे खगोल अभ्यासकांचे म्हणणे आहे. मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नाशिक ही राज्यातील व देशातील अन्य महानगरे आणि उपनगरांचीही हीच परिस्थिती असून मुंबईपासून शंभर ते दीडशे किलोमीटरचा टप्पा ओलांडून एखाद्या दूरच्या ग्रामीण भागात अथवा गड-किल्ल्यांवर जाऊन आकाश निरीक्षकांना निरीक्षण करावे लागत असल्याचे काही अभ्यासकांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा