मुंबई : राज्यात गेल्या दोन वर्षांत दुष्काळ, अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना सरकारने १५ हजार कोटींची नुकसानभरपाई दिली. मात्र कांदा, दूध, कापूस आणि सोयाबीनच्या दरावरून शेतकऱ्यांच्या नाराजीचा महायुतीला लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसल्याची कबुली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दिली. शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी लवकरच केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय कृषी मूल्य व किंमत आयोगाचे अध्यक्ष विजय पाल शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमत निश्चित करण्यासाठी पश्चिम भारतातील राज्यांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. कृषीमंत्री धनंजय मुंडे, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्यासह गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, गोवा, दीव आणि दमणचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

Prime Minister Narendra Modi Home Minister Amit Shah visit Thane district
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात भाजपची मोर्चेबांधणी सुरू; पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचा ठाणे जिल्हा दौरा
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
cost of inauguration ceremony of Metro should be taken from honorarium of cm and Deputy cm says MLA Ravindra Dhangekar
मेट्रोच्या उदघाटन सोहळ्याचा खर्च मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मानधनामधून घेतला पाहिजे : आमदार रवींद्र धंगेकर
Sharad Pawars big statement about increasing oppression of women
महिलांवरील वाढत्या अत्याचाराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…
Nitin Gadkari Inauguration ceremony of development works held at Karvenagar Attendance of BJP workers is low
गर्दी जमविण्यासाठी भाजप ‘दक्ष’; गडकरींच्या सभेला अल्प उपस्थितीनंतर पदाधिकाऱ्यांना जाग
Amit Shah Nitin Gadkari Deputy Chief Minister Devendra Fadnavis Chandrasekhar Bawankule lead for Assembly elections 2024 in bjp
तिहेरी नेतृत्व; विधानसभेसाठी भाजपची धुरा गडकरी, फडणवीस, बावनकुळेंकडे
Amit Shah in nashik on Wednesday
नाशिक विभागात मित्रपक्षांच्या जागांवर भाजपची नजर, अमित शाह यांच्या उपस्थितीत बुधवारी आढावा
Amit Shah on two days tour of the state print politics news
अमित शहा आजपासून दोन दिवस राज्याच्या दौऱ्यावर; मोदी गुरुवारी पुण्यात

हेही वाचा >>> “संघाकडे मदत न मागितल्याने भाजपाची खराब कामगिरी”; RSS चा भाजपाला घरचा आहेर

बैठकीच्या उद्घाटनप्रसंगी शिंदे यांनी महायुती सरकारचे शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगितले. शेतमालाला चांगली किंमत व बाजारपेठ मिळावी यासाठी पंतप्रधानांसमोर आपले म्हणणे मांडल्याचे त्यांनी सांगितले.

मदत वेळेत पोहोचली नाही

कांदा निर्यातबंदीचा घोळ, दूध दर तसेच सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने साडे चार हजार कोटींच्या मदतीची व्यवस्था केली होती. मात्र ही मदत वेळेत न पोहोचल्याने नाराजीचा फटका बसल्याचे शिंदे म्हणाले. राज्यातही महायुतीचे सरकार गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय घेत आहे. केंद्रीय कृषी मूल्य व किंमत आयोगाच्या माध्यमातूनदेखील पिकांना चांगली किमान आधारभूत किंमत (एमएसपी) मिळाल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली. भरडधान्याचा प्रसार करण्याचा राज्य सरकार प्रयत्न करीत असून शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी मायक्रो मिलेट्सनाही एमएसपी देण्याची मागणी त्यांनी केली.