मुंबई: दिवसेंदिवस तापमान वाढत असल्याने नागरिकांना उष्माघाताचा त्रास होऊ लागला आहे. वाढत्या उकाड्यामुळे नागरिकांना त्वचेसंदर्भातील आजार उद्भवू लागले आहे. घामोळे, उबाळू, पुरळ, खाज आणि बुरशीजन्य रोग नागरिकांना होत असून, मागील काही दिवसांपासून या रोगांच्या रुग्णांमध्ये साधारण ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घामाच्या धारांमुळे नागरिकांना त्वचेचे रोग होतात. मागील काही दिवसांपासून मुंबईसह राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात तापमान वाढत आहे. वाढत्या तापमानामुळे अनेकांना उष्माघाताचा त्रास सहन करावा लागला आहे. मात्र त्याचबरोबर नागरिकांना त्वचारोगांचाही सामना करावा लागत आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा त्वचारोगाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.

Blood purification center, Kama Hospital,
मुंंबई : जी. टी. आणि कामा रुग्णालयातही रक्तशुद्धीकरण केंद्र
18th October 2024 Horoscope In Marathi
१८ ऑक्टोबर पंचांग: नोकरदारांच्या कुंडलीत अच्छे दिन तर…
due to heavy rain in uran farmer losing their crops
परतीच्या पावसामुळे उरणमधील शेतीचे नुकसान, कृषी विभागाने पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी
loksatta Lokshivar fake onion seeds in the market has increased for sale
लोकशिवार: कांद्याच्या बनावट बियाण्यांचा धोका
Inflation in food prices hit a nine month high of 5 5 percent
खाद्यान्नांच्या किमतीतील भडक्याने कहर; किरकोळ महागाई साडेपाच टक्क्यांच्या नऊमाही उच्चांकाला
car during Diwali Important tips
दिवाळीच्या दिवसात फटाक्यांमुळे होऊ शकते तुमच्या गाडीचे नुकसान; सुरक्षेसाठी महत्त्वाच्या टिप्स
dengue-malaria in Bhayander number of patients quadrupled within a month
पिंपरीत डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ; १७,५०० घरांमध्ये सापडल्या अळ्या
amazon india announces significant reduction in selling fees
ॲमेझॉनकडून विक्रेत्यांच्या शुल्कात कपात; दिवाळीच्या तोंडावर पाऊल; राज्यातील १ लाख ८० हजारांना फायदा

हेही वाचा… मुंबई : आर्थिक घोटाळ्यातील सर्व झोपु प्रकल्पांवरील स्थगिती ‘ईडी’कडून मागे!

करोनामुळे नागरिक घरातून बाहेर पडत नव्हते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये त्यांना त्वचेसंदर्भातील फारसे आजार झाले नव्हते. मात्र यावेळी वाढत्या उकाड्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून घामोळे, उबाळू, बुरशीजन्य रोग, खाज, पुरळ यांसारखे त्वचेसंदर्भातील रोग नागरिकांना होण्याचे प्रमाण वाढले आहे. महिनाभरामध्ये या रोगांच्या रुग्णांमध्ये साधारण ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याची माहिती सेंट जॉर्जेस रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर यांनी दिली.

हेही वाचा… “आता सामुदायिक हत्याकांड होऊ शकतं, कारण…”, संजय राऊत यांचं मोठं विधान

प्रचंड उष्णतेमुळे नागरिकांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात घाम येतो. हा घाम शरीरावर साचून राहिल्याने त्वचेवरील घाणेंद्रिये बंद होतात. घाणेंद्रिये वेळीच पाण्याने स्वच्छ न केल्यास त्वचेचे विकार होण्यास सुरुवात होते. मुंबईमधील वाढत्या तापमानामुळे नागरिकांना घामाच्या धारा लागत आहेत. घामामुळे त्वचाविकाराच्या रुग्णांच्या संख्येत महिनाभरापासून वाढ झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने बुरशीजन्य रोग, घामोळे आणि उबाळू आलेल्या रुग्णांची संख्या अधिक असल्याची माहिती जे.जे.रुग्णालयातील त्वचाविकार विभागातील डॉक्टरांनी दिली.

काय काळजी घ्याल

  • घाम सतत येत असल्याने दिवसांतून दोन वेळा साध्या पाण्याने अंघोळ करा.
  • अंघोळ शक्य नसेल तर ओल्या कपड्याने शरीर चांगले पुसून काढा.
  • नियमित डस्टिंग पावडरचा वापर करावा.
  • सतत घाम येणाऱ्या जागेवर डस्टिंग पावडर लावावी.