मुंबई : ओमकार रिॲल्टर्स आणि डेव्हलपर्सचे प्रवर्तक बाबूलाल वर्मा आणि अध्यक्ष कमल किशोर गुप्ता यांना विशेष न्यायालयाने बुधवारी आर्थिक गैव्यवहाराच्या आरोपांतून दोषमुक्त केले. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याबाबत (पीएमएलए) सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निकालाच्या आधारे दिलेला हा पहिलाच निर्णय असून अंमलबजावणी संचालनालयासाठी (ईडी) हा मोठा धक्का आहे.

आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) स्थापन विशेष न्यायालयाने वर्मा आणि गुप्ता या दोघांची मूळ गुन्ह्यातून निर्दोष सुटका झाल्याच्या आधारे त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला होता. मूळ गुन्ह्याच्या अनुषंगाने ईडीने या दोघांविरोधात तक्रार नोंदवली होती. परंतु मूळ गुन्ह्यांत दोघांची निर्दोष सुटका झाली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने पीएमएलएप्रकरणी नुकत्याच दिलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर विशेष न्यायालयाने या दोघांना अंतरिम जामीन मंजूर केला होता. त्यानंतर या दोघांनी आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांतूनही दोषमुक्त करण्याच्या मागणीसाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता.

mumbai high court Nagpur Bench
आकस्मिक निधीत सहकार्याची मागणी भ्रष्टाचार नव्हे…कोर्टाच्या एका निर्णयाने लाचखोरीच्या आरोपीला…
21st September Rashi Bhavishya & Marathi Panchang
२१ सप्टेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थीला बाप्पा करणार ‘या’…
Court orders state government to publish advertisement for Chief Information Commissioner post Mumbai news
मुख्य माहिती आयुक्तपदासाठी सुयोग्य व्यक्ती सापडेना; राज्य सरकारचा उच्च न्यायालयात अजब दावा
ed file case against four people including executive chairman of religare
ईडीच्या तक्रारीवरून ‘रेलिगेअर’च्या कार्यकारी अध्यक्षांसह चौघांविरोधात गुन्हा, बर्मन कुटुंबाविरोधात खोटी माहिती दिल्याचा आरोप
Madhabi Puri Buch
Madhabi Puri Buch : ‘सेबी’च्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांच्या अडचणीत वाढ? ‘हिंडनबर्ग’च्या आरोपांची लोकलेखा समितीकडून चौकशीची शक्यता
national human rights commission orders police inquiry into detaining rti activist
माहिती अधिकार कार्यकर्त्याला केले नजरकैद; पोलिसांच्या चौकशीचे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे आदेश
A case has been filed against 15 people including an official employee contractor in the case of embezzlement in Malegaon Municipal nashikS
मालेगाव मनपातील अपहार प्रकरणी अधिकारी-कर्मचारी, ठेकेदारासह १५ जणांविरुध्द गुन्हा – लाचलुचपत प्रतिबंधकची कारवाई
women s safety top national priority pm modi at lakhpati didi sammelan
महिला सुरक्षेला प्राधान्य; जळगावमधील कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन, अत्याचार रोखण्यासाठी केंद्राकडून सहकार्याची ग्वाही

विशेष न्यायालयाने गुप्ता आणि वर्मा या दोघांचे म्हणणे मान्य करून त्यांना आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांतून दोषमुक्त केले. पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडी तक्रार नोंदवून तपास सुरू करते. मात्र मूळ गुन्ह्यात आरोपी दोषमुक्त किंवा निर्दोष सुटला असेल तर ईडीने नोंदवलेल्या प्रकरणातूनही त्याची सुटका होते, असे सर्वोच्च न्यायालयाने जुलै महिन्यातील निकालात म्हटले होते.

दरम्यान, वर्मा आणि गुप्ता यांना अंतरिम जामीन मंजूर करण्याच्या विशेष न्यायालयाच्या निर्णयाविरोधात ईडीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्याची ईडीची विनंती अमान्य केली होती. तसेच विशेष न्यायालयाच्या आदेशाबाबतही काही आदेश देण्यास नकार दिला होता. ईडीने आपले म्हणणे विशेष न्यायालयासमोर मांडावे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. विशेष न्यायालयात वर्मा आणि गुप्ता यांच्या अर्जावर सुनावणी पूर्ण झाल्यानंतरच उच्च न्यायालय हस्तक्षेप करेल. प्रकरण विशेष न्यायालयासमोर असल्याने तिथेच ऐकले जावे, असेही न्यायालयाने ईडीला दिलासा तातडीचा दिलासा नाकारताना नमूद केले होते.