भारतीय जनता पक्षाचे मुंबईतील नरिमन पॉईंट भागात प्रदेश कार्यालय आहे. या कार्यलयातून राज्यभरातील भाजपा संघटनेचे काम पाहिले जाते. आज रविवारी सुट्टी असल्यामुळे कार्यालयात डागडुजीचे काम सुरू होते. यावेळी शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याची घटना घडली आहे. यावेळी आजूबाजूच्या परिसरात धुराचे लोट पाहायला मिळाले.

टीव्ही ९ वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार कार्यालयातील किचनमध्ये वेल्डिंगचे काम सुरू असताना शॉर्ट सर्किट होऊन आग पसरली. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न केले गेले.

chhattisgarh police managed to kill 9 Naxalites
छत्तीसगडमधील चकमकीत एका जहाल नेत्यासह ९ नक्षलवादी ठार
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
The accused who molested a 13 year old girl in Dahisar area was arrested from Uttar Pradesh Mumbai news
अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्याला उत्तर प्रदेशातून अटक; एमएचबी कॉलनी पोलिसांची कारवाई
Keshavnagar school, Nagpur,
नागपूर: रस्त्यालगतच्या केशवनगर शाळेची ‘ही’ समस्या कधी दूर होणार?
The result of the bandh in the western part of Malegaon to protest the atrocities against Hindus in Bangladesh nashik
मालेगावातील पश्चिम भागात बंदचा परिणाम
Kolkata doctor rape, strike, MARD,
कोलकाता येथील डॉक्टरवर बलात्कार प्रकरण : ‘मार्ड’चा राज्यव्यापी संप
Traffic congestion at different place in Nashik city
नाशिक : शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी
Is Wadala area in Nashik municipal area marchers questions
वडाळा परिसर नाशिक मनपा क्षेत्रात आहे का? पाणी पुरवठ्यासह समस्याग्रस्त मोर्चेकऱ्यांचा प्रश्न

सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राुहल नार्वेकर आणि आमदार प्रसाद लाड कार्यालयात दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. माध्यमांशी बोलत असताना प्रसाद लाड म्हणाले की, कार्यालयात आग लागल्यानंतर उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आगीवर नियंत्रण अग्निशामक साहित्याचा वापर केला. ही आग मुख्य कार्यालयात लागली नसून कार्यालयाच्या मागच्या बाजूस लागली होती. त्यामुळे कार्यालयाचे फार नुकसान झालेले नाही.

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर माध्यमांशी बोलताना म्हणाले की, आग लागली तेव्हा जवळपास १०० माणसे आत होते. मात्र त्यांना तात्काळ बाहेर काढण्यात आले. अग्निशामक दलाने वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे आग लवकर नियंत्रणात आली. कदाचित आगीमुळे मोठे नुकसान होऊ शकले असते. पण ते टाळले गेले. कोणत्याही व्यक्तीला इजा पोहोचलेली नाही. इतर नुकसानाचा नंतर आढावा घेण्यात येईल.

बातमी अपडेट होत आहे..