शिवसेना खासदार संजय राऊत यांना १०० हून अधिक दिवस तुरुंगात राहिल्यानंतर अखेर जामीन मिळाला. त्यानंतर अनेक नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. शिवसेनेचेही अनेक नेते त्यांची भेट घेत आहेत. अशातच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शुक्रवारी (११ नोव्हेंबर) संजय राऊतांची भेट घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना या भेटीत नेमकी काय चर्चा झाली त्याची माहिती दिली.

अंबादास दानवे म्हणाले, “मी संजय राऊत यांच्या भेटीसाठी आलो होतो, भेट झाली. मागच्या तीन-चार महिन्यापासून प्रत्यक्ष भेट नव्हती. या भेटीत त्यांचे वेगवेगळे अनुभव, किस्से यावर गप्पा मारल्या. येणाऱ्या काळात संजय राऊत शिवसेना नेते म्हणून महाराष्ट्रात पुन्हा ताकदीने नवा लढा उभारतील.”

chandrashekhar bawankule back nitesh rane over controversial remarks on muslim
बावनकुळेंकडूनही नितेश राणेंची पाठराखण, म्हणाले ” त्यांचे वक्तव्य…”
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा…
supriya sule on balasaheb thorat cm post statement
Supriya Sule : “राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल”, बाळासाहेब थोरातांच्या विधानावर सुप्रिया सुळेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाल्या…
jayant patil secret explosion on bhagyashree atrams entry in sharad pawar ncp
गडचिरोली : “राष्ट्रवादीतील फुटीनंतर भाग्यश्री आत्राम शरद पवारांच्या संपर्कात,”जयंत पाटील यांचा गौप्यस्फोट
Wardha, Narendra Modi, Nitesh Karale master,
वर्धा : सभा पंतप्रधान नरेंद्र मोदींची अन् संतप्त मात्र कराळे गुरुजी! काय आहे कारण?
rohit pawar on ajit pawar confession
Rohit Pawar : “ज्या पक्षाने कुटुंब फोडलं, त्यांना…”; अजित पवारांच्या ‘त्या’ कबुलीनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया!
narayan rane on devendra fadnavis
देवेंद्र फडणवीसांनी सुरत लुटीबाबत केलेल्या विधानावर नारायण राणेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले…
Power contract workers union hunger strike postponed
ऊर्जामंत्र्यांशी चर्चेनंतर कंत्राटी कामगार संघटनेचे उपोषण स्थगित

“त्या गोष्टी माध्यमांना सांगायच्या नसतात”

“संजय राऊत यांच्याशी आगामी मुंबई विधानसभा निवडणुका आणि इतरही चर्चा झाल्या. मात्र, त्या गोष्टी माध्यमांना सांगायच्या नसतात. चर्चा झाली हे नक्की,” असं अंबादास दानवेंनी म्हटलं.

तेजस ठाकरे राजकारणात सक्रीय होणार का?

शिवसैनिकांकडून तेजस ठाकरे यांना राजकारणात सक्रीय करण्याची मागणी होत आहे. त्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता अंबादास दानवे म्हणाले, “तेज ठाकरे राजकारणात येणार की नाही याबाबत मला काही माहिती नाही. कारण, अशाप्रकारची मागणी शिवसैनिकांकडून होत असते. परंतु, राजकारणात येणार की नाही यावर स्वतः तेजस ठाकरेच निर्णय घेतील. मी त्यावर बोलण्याची आवश्यकता नाही.”

भाजपा नेत्यांच्या टीकेवर दानवेंची प्रतिक्रिया

संजय राऊत तुरुंगातून बाहेर आल्यानंतर सत्ताधारी भाजपाकडून जोरदार टीकाही होत आहे. किरीट सोमय्यांनी हिशोब द्यावा लागेल म्हटलंय, तर मोहित कुंबोज यांनी पुन्हा घराबाहेर पडावं लागेल, असं म्हणत राऊतांना टोला लगावला. त्यावर अंबादास दानवे म्हणाले, “महाराष्ट्रात आणि देशात संजय राऊतांची प्रतिमा लढाऊ नेते अशी आहे.”

हेही वाचा : “कोणालाही सोडणार नाही”, फडणवीसांच्या ट्वीटवर संजय राऊतांना प्रश्न, उद्धव ठाकरे म्हणाले, “याचा अर्थ…”

“न्यायालयाच्या तडाख्याने राऊतांवरील कारवाईला योग्य उत्तर”

“महाराष्ट्रात केंद्र सरकार आणि राज्य सरकार गद्दारी करून, ईडी-सीबीआयचा वापर करत आहे. यातूनच त्यांनी संजय राऊत यांना अटक केली. गुन्हा तर लांबच राहिला, पण न्यायालयाने ही अटकच बेकायदेशीर असल्याचं सुस्पष्टपणे म्हटलं आहे. न्यायालयाच्या या तडाख्याने या कारवाईला योग्य उत्तर मिळालं,” असंही अंबादास दानवेंनी नमूद केलं.