करोना आणि त्यामुळे आलेली टाळेबंदी याचा फटका सर्व स्तरातील लोकांना बसला. हॉटेल – रेस्टॉरंट व्यावसायिकांनाही याचा फटका बसला. गेल्या दीड वर्षात राज्यात अनेक महिने बुहतांश ठिकाणी हॉटेल-रेस्टॉरंट सेवा ही बंद राहीली, जी सुरु होती ती रडतखडत सुरु होती. वीजबील, जागेचे भाडे, कर्मचाऱ्यांचा पगार यामुळे या हॉटेल- रेस्टॉरंट व्यावसायिकांचे पेकाट मोडले होते. त्यातच वाढत्या महागाईमुळे या व्यवसायाशी संबंधित सर्वच गोष्टींचे दर हे वाढले आहेत. त्यामुळे आता यापुढे हॉटेल- रेस्टॉरंटमधील खाद्य पदार्थांचे दर वाढवण्याशिवाय गत्यंतर नसल्याचं हॉटेल- रेस्टॉरंटशी संबंधित संघटना ‘आहार’ने स्पष्ट केलं आहे.

“दरवर्षी साधारण जून महिन्यामध्ये हॉटेल- रेस्टॉरंटमधील खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होते. गेली दोन वर्ष ही वाढ झालीच नाही. तर दुसरीकरीकडे सर्वसमान्यांना करोनाचा फटका बसला आहे. तेव्हा दरवाढ करतांना याचाही विचार केला जाईल”, असं मत ‘आहार’चे उपाध्यक्ष निरंजन शेट्टी यांनी व्यक्त केलं आहे.

Dombivli Datta Nagar Fish Market news in update in marathi
डोंबिवलीतील दत्तनगरमधील मासळी बाजारामुळे वाहतूक कोंडी; मासळी बाजाराच्या स्थलांतराची नागरिकांची मागणी
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Nutrition Diet , Maharashtra School, Sweet Food ,
पोषण आहार बदल! साखर लोकांना मागा पण गोडधोड खाऊ घाला, अनुदान नाहीच
Moody Analytics made a statement on fiscal and monetary policy print eco news
वित्तीय, पतधोरणात मोठ्या सुधारणेनंतरच ६.४ टक्के विकासवेग शक्य- मूडीज
Loksatta editorial challenges before fm nirmala sitharaman in union budget 2025
अग्रलेख: सीतारामन ‘सिंग’ होतील?
low prices of tur in market
विश्लेषण : बाजारपेठेत तुरीच्या घसरणीमुळे शेतकऱ्यांशी कोंडी कशी?
boom IT sector Sensex nifty
‘आयटी’तील तेजीने सेन्सेक्सची ५६६ अंशांनी वाढ; शेअर बाजाराचे लक्ष आता अर्थसंकल्पाकडे
Edible oil imports increase by 16 percent What was the impact of the increase in palm oil prices Mumbai print news
खाद्यतेलाच्या आयातीत १६ टक्क्यांनी वाढ; जाणून घ्या, पामतेलाच्या दरवाढीचा परिणाम काय झाला

“याआधीच अनेक हॉटेल- रेस्टॉरंट यांनी दरवाढ केलेली आहे, करत आहेत. करोना काळामुळे हॉटेल- रेस्टॉरंट व्यवसाय हा पाच वर्षे मागे गेलेला आहे. दोन वर्षातील परिस्थिती आणि त्यात महागाई यामुळे खाद्य पदार्थांच्या दरात किमान २० टक्के एवढी दरवाढ ही अपेक्षित आहे. ही दरवाढ करतांना सर्वसामान्य ग्राहकांचाही विचार केला जात आहे” असं ‘आहार’चे सरचिटणीस सुकेश शेट्टी यांनी स्पष्ट केलं आहे.

तेव्हा जर तुम्ही हॉटेल- रेस्टॉरंटमध्ये गेलात आणि खाद्यपदार्थांचे दर वाढलेले असतील तर मुळीच आश्चर्य वाटायला नको. अनेक ठिकाणी ही दरवाढ झालेली आहे आणि यापुढील काही दिवसांत सर्वच ठिकाणी होणार आहे हे हॉटेल- रेस्टॉरंटशी संबंधित संघटनेनं दिलेल्या प्रतिक्रियांवरुन स्पष्ट होत आहे.

Story img Loader