स्वस्तात सदनिका देण्याचे आमिष दाखवून एका हॉटेल व्यावसायिकासह सातजणांची सुमारे साडेचार कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार जोगेश्वरी परिसरात घडला. याप्रकरणी मेघवाडी पोलिसांनी संबंधित कंपनीतील तीन संचालकाविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.

हेही वाचा >>>नागपूर ते मुंबई थेट आठ तासात प्रवास, डिसेंबर २०२३ पासून चार टप्प्यात समृद्धी महामार्गाचे लोकार्पण

Police seized prohibited animal meat worth rs 4 lakh near dombivli zws 70
डोंबिवलीजवळ चार लाखाचे जनावारांचे मांस जप्त
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
person cheated of Rs 6 crore 25 lakh in thane
ठाणे : जादा परताव्याच्या अमीषाने कोट्यवधीची फसवणूक
Success Story An inspiring journey from selling balloons
Success Story: रस्त्यांवर फुगे विकण्यापासून ते करोडोंची कंपनी उभी करण्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास
136 artificial ponds for immersion build in navi mumbai
नवी मुंबईत यंदा १३६ कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती; जलप्रदूषण टाळण्याचे आयुक्तांचे आवाहन
pimpari young man attacked by koytta
गणेशोत्सवाची वर्गणी गोळा करण्यावरून तरुणावर कोयत्याने वार; कुठे घडली घटना?
Union Minister Of port and shipping approved wage hike of port and dock workers
बंदर, गोदी कामगारांना साडेआठ टक्के वेतनवाढ, केंद्रीय बंदर व जहाजमंत्र्यांची मंजुरी
Amravati news Article on Farmers Crop Insurance
शेतकरी आहात?… पीकविमा काढायचा विचार करताय?…मग ‘हे’ वाचाच…

जोगेश्वरी परिसरात वास्तव्यास असलेल्या तक्रारदार मोहनदास शेट्टी (६८) त्यांचे गोरेगाव येथे ‘मोहन पंजाब’ नावाचे हॉटेल आहे. जोगेश्वरीमध्ये एका इमारतीचे बांधकाम सुरू असून या इमारतीत एक सदनिका स्वस्तात देण्याचे आमिष आरोपींपैकी एकाने मोहनदास यांना दाखविले होते. भोजू शेट्टी, प्रवीण शेट्टी, रत्नाकर शेट्टी, प्रिया विजय शेट्टी, आनंद शेट्टी आणि आयतु मूल्या यांनी एक गट तयार करून एकत्र सदनिका खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता, असे मोहनदास यांनी सांगितले. मोहनदास शेट्टी यांनी ४२ लाख ७० हजार रुपये, भोजू शेट्टी यांनी ४७ लाख ६० हजार रुपये, प्रवीण शेट्टी यांनी ३७ लाख ४० हजार रुपये, जगदीश बजाज यांनी ६२ लाख रुपये, प्रिया शेट्टी यांनी ५८ लाख रुपये, आनंद शेट्टी यांनी ५५ लाख ५५ हजार रुपये, रवी दोशी यांनी पाच लाख रुपये असे एक कोटी ९२ लाख ४१ हजार रुपये रोख, तर दोन कोटी ५१ लाख ४४ हजार रुपये धनादेशाद्वारे देण्यात आले होते. पण १४ वर्षांनंतरही हा प्रकल्प पूर्ण झाला नाही. तसेच तक्रारदार व इतर व्यक्तींचे पैसेही देण्यात आले नाहीत. अखेर त्यांनी याप्रकरणी मेघवाडी पोलिसांत तक्रार केली होती. पडताळणी केल्यानंतर पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक कंपनीच्या तीन संचालकांविरोधात फसवणूक, तसेच महाराष्ट्र मालकी हक्कांच्या सदनिका अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.