लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित उपनगरी रेल्वेगाड्यांमध्ये वारंवार होणारे बिघाड, प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे बंद पडणारी वातानुकूलित यंत्रणा, तांत्रिक बिघाडामुळे उघडे राहणारे दरवाजे अशा समस्यांमुळे बेजार झालेल्या प्रवाशांना भविष्यात दिलासा मिळेल, असा दावा पश्चिम रेल्वे प्रशासनाने केला आहे. यासाठी कृती आराखडा तयार करून या रेल्वेगाड्यांच्या देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत.

Wrong Signal Wadala Station
मुंबई : स्टेशन मास्तरचा चुकीचा सिग्नल अन् गोरेगावला जाणारी लोकल वाशीला निघाली, पुढे काय झालं?
Mumbai local 24 years ago old video goes viral
मुंबई लोकलमध्ये २५ वर्षांपूर्वी किती गर्दी असायची? सोशल मीडियावर व्हायरल झालेला Video पाहाच
Young girl photoshoot on dam and she fell in dam water shocking video
VIDEO: जीव एवढा स्वस्त असतो का? रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; पाण्याच्या प्रवाहात तरुणी क्षणात दिसेनाशी झाली
video having fun with the kids under the waterfall suddenly the water level rose and the picture changed shocking video goes viral
लोणावळ्याची घटना ताजी असतानाच आणखी एक VIDEO समोर; काही सेंकदांत घेतलेल्या निर्णयामुळे असा बचावला चिमुकला
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
Bees attacked on women who had gone for vatpaurnima in Nive village of Poladpur taluka
रायगडात वटपूजन करताना अघटित घडले… जाणून घ्या काय आहे प्रकार…
Nagpur Results Nitin Gadkari Major Win Can Change Prime Minister Power Game
नितीन गडकरींचा विजय पालटणार सत्तेचा खेळ? ज्योतिषतज्ज्ञ म्हणतायत, “२०२४ पर्यंत काळजी, तर २०२६ ला मोठा..”

वातानुकूलित उपनगरी रेल्वेगाड्यांना प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. सध्या पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात सात रेक आहेत. त्यांच्या ९६ फेऱ्या होतात. मात्र, अनेकदा वातानुकूलित रेल्वेगाड्यांमध्ये तांत्रिक बिघाडांची मालिका सुरू झाली होती. या गाड्यांमध्ये थंड हवा येणे बंद होणे, डब्यांचे दरवाजे बंद न होणे अशा घटना घडत होत्या. त्यामुळे अधिकचे पैसे मोजून वातानुकूलित लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत होता. याबाबत प्रवाशांनी अनेक तक्रारी केल्या होत्या.

आणखी वाचा-गॅस्ट्रो, हिवतापाने मुंबईकर हैराण, जूनमध्ये साथीच्या आजारांचे १,३९५ रुग्ण

त्यामुळे या समस्या सोडविसाठी मुंबई सेंट्रल विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई सेंट्रल, कांदिवली आणि विरार येथील रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले होते. त्यानंतर त्यातील बिघाड दूर करण्यासाठी कृती आराखडा आखला. प्रत्येक समस्येचे कारण शोधणे, त्याचे विश्लेषण करून, त्या समस्यांचा कायमस्वरूपी उपाय शोधून काम करण्यात आले. तसेच रेकची वारंवार तपासणी आणि देखभाल-दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे आता रेल्वेगाड्यांतील समस्या दूर झाल्याचे प्रशासनाने सांगितले.

वातानुकूलित रेल्वेगाडीला मोठी पसंती आहे. वातानुकूलित रेल्वेगाड्यांच्या फेऱ्या वाढत असल्याने प्रवाशांचा प्रतिसाद वाढत आहे. मात्र, काही वेळा वातानुकूलित रेल्वेगाड्यांमध्ये तांत्रिक बिघाड होत होता. यावर तोडगा काढण्यात आला असून आता बिघाड कायमचा बंद झाला आहे. त्यामुळे वातानुकूलित रेल्वेगाड्यांतील ९५ टक्क्यांहून अधिक बिघाड दूर झाला आहे. -विनीत अभिषेक, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे