भारतीय जनता युवा मोर्चाचे मुंबईचे पदच्युत अध्यक्ष गणेश पांडे यांच्यावरील विनयभंगाच्या आरोपावरून गुरुवारी पुन्हा एकदा विधानसभेत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी या विषयावर स्थगन प्रस्ताव दिल्यानंतर त्यावर बोलताना गणेश पांडेला अजून अटक का झालेली नाही, असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला. फडणवीस यांनीही या प्रश्नाला लगेचच प्रत्युत्तर देत सरकार कोणालाही पाठिशी घालण्याचे कारणच नाही. तपास सुरू असून, पोलीस योग्य ती कारवाई करतील, असे सभागृहात सांगितले.
या प्रकरणात कालच पीडित महिलेकडून वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सभागृहात हा विषय मांडताना जयंत पाटील म्हणाले, गणेश पांडेंविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पण अद्याप त्यांना अटक झालेली नाही. पीडित महिला आणि पांडे हे दोघेही टेलिव्हिजनवर मुलाखती देताना मुख्यमंत्र्यांवर आपला विश्वास असल्याचे सांगताहेत. पीडित महिलेने याआधी लिहिलेले पत्रही गंभीर असून, त्यामध्ये मंत्रिमंडळातील एका मंत्र्याचाही उल्लेख आहे. पण सराकरकडून अजून कोणतीही कारवाई झालेली दिसत नाही. त्यामुळे समाजात भयगंडाची भावना पसरली आहे. सरकारने काय कारवाई केली, याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी निवेदन करून द्यावे, अशी मागणी त्यांनी अध्यक्षांकडे केली.
त्यावर लगेचच उत्तर देताना फडणवीस म्हणाले, पीडित महिलेने आशिष शेलार यांना पत्र लिहिल्यावर त्यांनी संबंधित महिलेला पोलीस तक्रार करण्यास सांगितले होते. पण तिने सुरुवातीला पोलीस तक्रार करण्यास नकार दिला होता. तरीही सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन राज्य महिला आयोगाला चौकशी करण्याचे आदेश दिले होते. पीडित महिलेने काल पोलीस तक्रार केली आहे. पोलीस तपास करीत आहेत. सरकार कोणालाही पाठिशी घालणार नाही. दोषींवर नक्कीच कारवाई केली जाईल.

election commission status to cooperative election authority
सहकार निवडणूक प्राधिकरणाला आयोगाचा दर्जा
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
NGO , social work, transparency, accountability,
संस्थांची संस्थाने होताना..
NGO , social work, transparency, accountability,
संस्थांची संस्थाने होताना..
cm Devendra fadnavis marathi news
Supriya Sule : राज्य सरकारवर खासदार सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप, म्हणाल्या…!
State government claims in High Court that there is no policy decision yet to start group schools Mumbai news
समूह शाळा सुरू करण्याचा अद्याप धोरणात्मक निर्णयच नाही; राज्य सरकारचा उच्च न्यायालयात दावा, जनहित याचिका निकाली
citizens affected by garbage fires in kolhapur
कोल्हापुरात कचरा आगीने त्रस्त नागरिकांकडून संताप; प्रशासक धारेवर, पालकमंत्र्यांचीही भेट
Mumbaikars supplied with only clean disinfected water claims mumbai municipal administration
मुंबईकरांना निर्जंतुकीकरण केलेल्या स्वच्छ पाण्याचाच पुरवठा, महापालिका प्रशासनाचा दावा
Story img Loader