मुंबई : घाटकोपर येथील महाकाय फलक दुर्घटनेप्रकरणी इगो मीडियाचा मालक भावेश भिंडे याला करण्यात आलेली अटक कायदेशीरच असल्याचे उच्च न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट केले. तसेच, अटक बेकायदा ठरवून तातडीने जामिनावर सुटका करण्याचे आदेश द्यावेत या मागणीसाठी भिंडे याने केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली.

भिंडे याला अटक करताना योग्य कायदेशीर प्रक्रिया राबवण्यात आली. ती बेकायदा असल्याचे किंवा त्यात काही त्रुटी असल्याचे आम्हाला आढळून आले नाही. त्यामुळे, आपल्याला बेकायदेशीर पद्धतीने ताब्यात ठेवल्याचा भिंडे याचा आरोप चुकीचा आहे, अशी टिप्पणी न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने उपरोक्त निर्णय देताना केली. खंडपीठाने भिंडे याच्या याचिकेवर बुधवारी सविस्तर सुनावणी घेतल्यानंतर या प्रकरणी शुक्रवारी निर्णय देण्याचे स्पष्ट केले होते.

Nagpur Bench of Bombay High Court Acquitted woman who arrested in naxalism case
नागपूर : नक्षलवादाच्या प्रकरणात अडवलेल्या महिलेची उच्च न्यायालयाकडून निर्दोष सुटका… पोलीस कारवाईवर प्रश्न
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
supreme Court on Kolkata Rape case
Kolkata Rape and Murder : कोलकाता पीडितेच्या हत्येआधीचे काही तास कसे होते? सहकाऱ्यांनी काय सांगितलं?
delhi police chargesheet in parliament security breach
संसद घुसखोरीप्रकरणी दिल्ली पोलिसांकडून आरोपपत्र दाखल; लोकशाहीची नाचक्की करण्याचा हेतू असल्याचा आरोप
Loksatta anvyarth Bombay High Court decision Ganesha idol Immersion Ganeshotsav
अन्वयार्थ: राज्य कायद्याचे की अस्मिताकारणाचे?
Wardha, Cheating, government treasury,
वर्धा : चहा, नाश्त्याच्या नावे शासकीय तिजोरीवर डल्ला, गुन्हा दाखल होताच आरोपी अधिकाऱ्याची…
High Court said demanding money by Gesture is not corruption
उच्च न्यायालय म्हणाले, इशाऱ्याने पैशाची मागणी करणे भ्रष्टाचार नव्हे…
badlapur case protest mahavikas aghadi
राजकीय पक्षांना बंद पुकारण्याचा अधिकार आहे का? बदलापूर प्रकरणातील बंदविरोधात न्यायालयाने काय निर्णय दिला?

हेही वाचा – नवी मुंबईतील गृहखरेदी घोटाळा : मोनार्क युनिव्हर्सलच्या गोपाळ ठाकूर यांना साडेतीन वर्षांनंतर जामीन

फलक दुर्घटना हे प्राक्तन होते. त्यासाठी आपल्याला जबाबदार धरले जाऊ शकत नाही, असा दावा करून भिंडे याने आधी जामिनाची मागणी केली होती. त्यानंतर, त्याने आपल्याला बेकायदेशीररीत्या ताब्यात ठेवण्यात आले होते, असा दावा करून अटक बेकायदा ठरवण्याची आणि तातडीने जामिनावर सुटका करण्याची मागणी केली होती.

हेही वाचा – बहिणीच्या उपचारासाठी शेअर बाजारातून मोठा नफा मिळविण्याचा प्रयत्न, पण सायबर भामट्यांनी केली फसवणूक

दुसरीकडे, भिंडे हा पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी ओळख बदलून राजस्थानमधील उदयपूर येथे वेगवेगळ्या हॉटेलमध्ये वास्तव्य करत होता. त्याचा ठावठिकाणा लागल्यानंतर, १६ मे रोजी पोलिसांनी त्याला उदयपूर येथून ताब्यात घेतले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला गुजरातमार्गे मुंबईत आणून अटक करण्यात आली, असा दावा मुंबई पोलिसांच्या वतीने सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी युक्तिवादाच्या वेळी केला होता. राजस्थान येथून मुंबईत आणल्यानंतर भिंडे याला १७ मे रोजी दुपारी १२.४० वाजता अटक करण्यात आली. अटकेनंतर २४ तासांच्या आत त्याला न्यायदंडाधिकाऱ्यासमोर हजर करण्यात आले. त्याच वेळी भिंडे याला अटकेची लेखी कारणेही देण्यात आल्याचा दावाही पोलिसांनी केला होता.