लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर ‘सरकार आपल्या दारी’, ‘जनतेशी सुसंवाद’ कार्यक्रमाच्या माध्यमातून बुधवार आणि गुरुवारी नागरिकांशी संवाद साधणार आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या ‘सी’ आणि ‘डी’ विभाग कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Keshavrao Jagtap statement
बारामतीचा विकास हाच अजित पवार यांचा ध्यास- केशवराव जगताप
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
interfaith couple legal protection by maharashtra government
आता बिनधास्त करा प्रेमविवाह! ,सरकार देणार ‘सेफ हाऊस’
Prakash Abitkar
खासगी रुग्णालयांना दिलासा देणारं आरोग्यमंत्र्यांनी उचललं पाऊल
Meet the citizens every Tuesday-Wednesday Commissioners circular
दर मंगळवार- बुधवारी नागरिकांना भेटा, आयुक्तांचे परिपत्रक
Eknath Shindes statement said beloved brother is bigger than post of Chief Minister or Deputy Chief Minister
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदापेक्षा लाडका भाऊ मोठा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधान
What are Blue Corner and Red Corner Notices issued by Interpol
इंटरपोलकडून जारी होणाऱ्या ब्लू कॉर्नर, रेड कॅार्नर नोटिस म्हणजे काय? किती महत्त्व आहे अशा नोटिसांना?
Health Minister Prakash Abitkar announces separate health policy for the Maharashtra state
राज्यात प्रथमच स्वतंत्र आरोग्य धोरण; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची घोषणा

नागरिकांशी संवाद साधण्यासाठी ‘सरकार आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, १० मे रोजी चंदनवाडी, मरिन लाइन्स येथील महानगरपालिकेच्या ‘सी वॉर्ड’ विभाग कार्यालयात, तर गुरूवार, ११ मे रोजी ग्रॅन्टरोड येथील ‘डी’ विभाग कार्यालयात दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत दीपक केसरकर नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

आणखी वाचा-मुंबईः संशयावरून प्रेयसीवर चाकूने हल्ला, आरोपीचा मित्रावरही हल्ला

शासकीय योजना, प्रभागातील विकासकामांबाबत सूचना व इतर समस्यांबाबतच्या निवेदन अथवा अर्जासह उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. त्याचप्रमाणे ‘जनतेशी सुसंवाद’ कार्यक्रमास पालकमंत्र्यांसोबत संबंधित विभागांतील लोकप्रतिनिधी, सर्व विभागांचे शासकीय, तसेच मुंबई महानगरपालिकेचे अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केसरकर यांनी केले आहे.

Story img Loader