मुंबई : सध्या सुरू असलेले महत्त्वाकांक्षी प्रकल्प, नागरी सेवा-सुविधा, मुंबई सुशोभिकरण प्रकल्प, रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण आदी विविध कामांमुळे मुंबई महानगरपालिकेचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच वेळी उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेला मालमत्ता कर आटला आहे. त्यातच आता आणखी एक उत्पन्नाचा स्रोत असलेल्या पाणीपट्टीची थकबाकी तब्बल ३,३२० कोटी ०८ लाख रुपयांवर पोहोचल्याचे उघडकीस आले आहे. खासगी सोसायट्यांपाठोपाठ मध्य आणि पश्चिम रेल्वेने ५३४ कोटी ३० लाख रुपये पाणीपट्टी थकविली आहे. त्याचबरोबर महापालिकेची पाणीपट्टी थकविणाऱ्यांमध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार, म्हाडा, एमएमआरडीए, बेस्ट, मुंबई पोर्ट ट्रस्ट आदींचाही समावेश आहे. पाणीपट्टीची थकबाकी वाढू लागल्यामुळे भविष्यात जलविषयक कामांवर परिणाम होण्याची चिंता जल अभियंता विभागाला भेडसावू लागली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा