नाशिक : गोदावरीसह काही नद्यांची अवस्था बिकट आहे. पाण्याचा दर्जा निकृष्ट असल्याने त्यात स्नान करणेही हानीकारक ठरू शकते. नद्यांचे संरक्षण न झाल्यास भविष्यात मानवी जीवन संकटात येईल, असा धोका राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केला. येथे श्रीरामतीर्थ गोदावरी समितीच्यावतीने शुक्रवारी सायंकाळी गोदाघाटावर गोदा आरती आणि पुरस्कार वितरण सोहळा राज्यपाल राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. प्रारंभी त्यांनी गंगापूजन केले. यावेळी जल व पर्यावरण तज्ज्ञ महेश शर्मा यांना गोदावरी राष्ट्र जीवन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना राज्यपालांनी नद्यांच्या दुरावस्थेवर बोट ठेवत चिंता व्यक्त केली. गोदाकाठावर आपण उत्साहात जमलो, परंतु, नदीची अवस्था बिकट आहे. औद्योगिक वसाहती व शहरातील सांडपाणी नदीत मिसळते. ज्या नद्यांवर आपले जीवन अवलंबून आहे, त्यांचे जीवन अडचणीत येत आहे. कधीकाळी मुंबईतून पाच नद्या वाहत होत्या. त्या नष्ट होऊन आता केवळ मिठी नदी शिल्लक आहे. तिचे स्वरुपही नाल्यासारखे झाल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

pune sahakar nagar water supply cut
पुणे : शहरातील ‘ या ‘ भागात गुरुवारी पाणी नाही !
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
water intake in different forms
पाण्याला ‘सिद्धजल’ करण्याची का आवश्यकता आहे?
Donald Trump signs order withdrawing from World Health Organization
आरोग्याच्या मुळावर शेखचिल्लीची कुऱ्हाड!
All-party leaders oppose recommendation to change formula for equitable water distribution in Jayakwadi dam
जायकवाडी समन्यायी पाणी वाटपाचे सूत्र बदलण्याच्या शिफारशीच्या विरोधात सर्वपक्षीय नेते
17 percent water loss from 65 major irrigation projects in Maharashtra state
धरणांमधील १७ टक्के पाणी वाया! कालव्यांची दुरवस्था, बाष्पीभवनाच्या वाढत्या वेगाचा परिणाम
Yamuna Water Controversy
Yamuna Water Controversy: यमुनेचे पाणी पेटले; ‘अस्वच्छ पाणी जाहीररित्या पिऊन दाखवा’, केजरीवालांचे अमित शाह, राहुल गांधींना आव्हान
Which schools in Wardha district have water that is dangerous to drink
धोकादायक! ‘या’ शाळांतील पाणी पिण्यास घातक, जीवावर बेतणार…

मुंबई व दिल्लीसारख्या महानगरांमध्ये प्रदूषणाची समस्या चिंताजनक आहे. समाजाने नद्यांचे संरक्षण, त्यांना प्रदूषणमुक्त करण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता राधाकृष्णन यांनी मांडली. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी, उपाध्यक्ष शांताराम भानोसे आदी उपस्थित होते.

Story img Loader