मुख्यमंत्री – फडणवीस यांच्यात चर्चा

Expedite work of houses under PMAY in Maha says cm fadnavis
प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांच्या कामांना गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Maharashtra FM Ajit Pawar on state budget
राज्याच्या अर्थसंकल्पात ‘लाडक्या बहिणी’, सामान्य नागरिक केंद्रबिंदू; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा
NGO , social work, transparency, accountability,
संस्थांची संस्थाने होताना..
what 12 lakh exemption means and how tax is calculated
१२ लाख करमुक्त उत्पन्नाची सवलत नेमकी कुणासाठी?
one nation one time
One Nation, One Time नक्की आहे तरी काय? सरकारने याचा मसुदा का तयार केला? याचा फायदा काय?
MLA Jorgewar organized BJP workers meeting and guardian minister felicitation program here.
पालकमंत्र्यांच्या सत्कारासाठी सभागृह देण्यास जिल्हाधिकाऱ्यांचा नकार; मनाई असतानाही आमदार किशोर जोरगेवार यांनी…
Guardian Minister Shivendra Singh Raje Bhosle Mitra Mandal circle of friends latur
लातूरामध्ये पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्र मंडळाची ‘अचानक’ स्थापना

मुंबई : मंत्रिमंडळाने सुधारणा के ल्यावर जिल्हा परिषदा आणि पंचायती निवडणुकांमध्ये इतर मागासवर्गीय समाजाला (ओबीसी) राजकीय आरक्षण लागू करण्याच्या अध्यादेशावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अखेर गुरुवारी स्वाक्षरी के ली. त्रुटींवर बोट ठेवत राज्यपालांनी मसुदा सरकारकडे आधी परत पाठविला होता.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतर मागासवर्गीय समाजाला राजकीय आरक्षण देण्यासाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय गेल्या आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. परंतु काही त्रुटींवर बोट ठेवत राज्यपालांनी अध्यादेशाचा मसुदा राज्य सरकारकडे परत पाठविला होता. ‘लोकसत्ता’ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करताच राजकीय वर्तुळात त्याची तीव्र प्रतिक्रि या उमटली होती. राज्यपालांनी मसुदा परत पाठविल्याने बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुधारणा करण्यात आली होती. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांचे एकत्रित आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा अधिक होणार नाही अशी सुधारणा मंत्रिमंडळाने के ली. तसेच इतर मागासवर्गीय समाजाला २७ टक्यांपर्यंत आरक्षण लागू राहिल, अशी तरतूद   करण्यात आली आहे.

 मंत्रिमंडळाने सुधारणा करून नव्याने प्रस्ताव राजभवनकडे पाठविला. त्यानुसार राज्यपालांनी  स्वाक्षरी के ल्यावर अध्यादेश लागू झाला. महापालिका व नगरपालिकांमध्ये ५० टक्यांपर्यंत आरक्षण लागू करण्याकरिता अध्यादेश काढण्याचा निर्णय कालच घेण्यात आला. हा प्रस्ताव राजभवनकडे मंजुरीसाठी पाठविला जाईल.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही उपस्थिती

ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात सविस्तर चर्चा झाली. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा उपस्थित होते. राज्य मागासवर्ग आयोगाच्या उच्चपदस्थांनीही मुख्यमंत्री व फडणवीस यांना काही माहिती या वेळी सादर के ली. इतर मागासवर्गीयांचे मागासलणेपण सिद्ध झाल्याशिवाय राजकीय आरक्षण लागू होऊ शकणार नाही. यामुळे मागासलेपण सिद्ध करण्याकरिता सरकारने प्रयत्न सुरू के ले आहेत. या प्रक्रि येबाबत मुख्यमंत्र्यांनी फडणवीस यांना विश्वासात घेतल्याचे सांगण्यात आले.

Story img Loader