मुंबई : ‘गोविंदा रे गोपाळा…’, ‘बोल बजरंग बली की जय’ असा जयघोष करीत मुंबईसह राज्यभर दहीहंडी उत्सवाचा उत्साह द्विगुणीत होत असतानाच मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली. जलधारा अंगावर झेलत आणि मैदानातील चिखलाची पर्वा न करता गोविंदा पथकांतील गोविंदा उंचच मानवी मनोरे रचण्यात मग्न होते.

पावसाच्या धारा अंगावर झेलत काही गोविंदा पायी चालत दहीहंडी उत्सवस्थळी मार्गस्थ होत होते, तर काही गोविंदा दुचाकीवरून मोठ्या पारितोषिकांच्या दहीहंड्यांचा शोध घेत संचार करीत होते. दरम्यान, मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि ढोल-ताशा, बेन्जो, कच्छी बाजाच्या तालावर पावसात भिजत तरूणाई थिरकू लागली. तसेच दहीहंडी उत्सवस्थली मैदानांमध्ये चिखल झाला होता. या चिखलातून वाट काढत गोविंदा पुढे जात होते. मुसळधार पावसाच्या धारा आणि चिखलामुळे गोविंदा पथकांना मानवी मनोरे रचताना अडचणी येत होत्या. मात्र या अडचणींवर मात करीत गोविंदा मानवी मनोरे रचत होते. मानवी मनोऱ्यांचा हा रोमहर्षक थरार अनुभवण्यासाठी नागरिकांनी हातात छत्री घेऊन ठिकठिकाणी गर्दी केली आहे.

Mahakumbh
Mahakumbh Stampede : ‘महाकुंभमेळ्याला येऊ नका…’, चेंगराचेंगरीत मृत्यू होण्याच्या काही तासापूर्वीच कर्नाटकातील महिलेने लोकांना केलं होतं आवाहन
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Rashtriya Swayamsevak Sanghs Virat shakha Darshan in Latur on Sunday
रा. स्व. संघाचे लातूरात रविवारी विराट शाखा दर्शन
Yogi Adityanath First Reaction
Stampede in Kumbh Mela : योगी आदित्यनाथ यांना अश्रू अनावर; म्हणाले,”चेंगराचेंगरीत ३० भाविकांचा बळी जाणं…”
Kumbh stampede 1952
Mahakumbh Stampede: एका हत्तीमुळे कुंभमेळ्यात गेले होते ५०० भाविकांचे प्राण; पंडित जवाहरलाल नेहरुंवर झाले आरोप
Prayagraj Stampede
Mahakumbh Stampede: महाकुंभमध्ये चेंगराचेंगरीनंतर पंतप्रधान मोदींचा तीन वेळा योगी आदित्यनाथांना फोन, नेमकी चर्चा काय झाली?
Stampede breaks out at Maha Kumbh on Mauni Amavasya
Stampede Breaks Out at Maha Kumbh : “महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरी झालीच नाही, फक्त भाविकांची…”, पोलिसांनी केलं स्पष्ट!
Protest by a pro-Khalistan mob outside the Indian High Commission in London met counter-protest
Video : लंडनमध्ये खलिस्तान समर्थकांना भारतीयांनी दिलं सडेतोड उत्तर; भारतीय दूतावासाबाहेर निदर्शनं सुरू होताच…

हेही वाचा >>>गोविंदाच्या टी-शर्टवर राजकीय संदेश अन् नेत्यांची छबी; आजी, माजी, भावी, इच्छुक लोकप्रतिनिधींचा टी-शर्टआडून प्रचार

भाजपतर्फे वरळीतील जांबोरी मैदानात परिवर्तन दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून ३ लाख ३३ हजार ३३३ रुपयांची मानाची दहीहंडी बांधण्यात आली असून भाजपच्या संतोष पांडे यांनी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सवाचे आयोजन केले आहे. तर शिवडी विधानसभेतर्फे मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली काळाचौकीमधील अभ्युद्यनगर येथील शहीद भगतसिंग मैदानात दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे वरळीतील जांबोरी मैदानात चिखल झाला, मात्र मुसळधार पावसाच्या साथीने गोविंदा पथकांनी मानवी मनोरे रचले. तर मैदानात मॅट नसल्यामुळे गोविंदा पथकांची गैरसोय झालीहे. तर काही गोविंदा पथकांना तासन््तास उभे राहावे लागत असल्यामुळे गोविंदा नाराजी व्यक्त करीत होते.

Story img Loader