मुंबई : दिल्लीतील पालिका बाजारच्या धर्तीवर मुंबईत दोन ठिकाणी भूमिगत बाजार सुरू करण्याची घोषणा करूनही त्याची अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिला. भूमिगत बाजार सुरू करून त्यात फेरीवाल्यांना जागा देण्याचे ठरवण्यात आले होते.

मोकळ्या भूखंडांच्या खाली हे भूमिगत बाजार सुरू करण्यात येईल. त्यासाठी दोन जागांची निवड करण्यात आली होती. त्यात दादर टीटी व शीव परिसरातील जागेची निवड केली होती. मात्र, अद्याप या दोन जागांवर भूमिगत बाजार सुरू करण्यासाठी कोणतीही हालचाल संबंधित अधिकाऱ्यांनी न केल्यामुळे केसरकर यांनी कारवाईचा इशारा दिला. दर आठवड्याला मुख्यालयात येऊन केसरकर आढावा बैठक घेत आहेत.

Thane Municipal Employees, Diwali, Thane Municipal Employees Salary, Thane,
ठाणे पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सानुग्रह अनुदानापाठोपाठ वेतन दिवळीआधी जमा होणार
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
Industrial Court summoned BESTs General Manager for denying alternative work to disabled drivers
‘बेस्ट’अधिकाऱ्यांना फौजदारी समन्स ; दिव्यांग चालकांना पर्यायी काम नाकारल्याबद्दल औद्योगिक न्यायालयाकडून समन्स
illegal constructions Navi Mumbai, Navi Mumbai,
नवी मुंबईतील बेकायदा बांधकामांवर सहा वर्षे उलटूनही कारवाई नाही, उच्च न्यायालयाचा नियोजन यंत्रणांच्या नाकर्तेपणावर संताप
Badlapur Case, High Court, police duty,
बदलापूर प्रकरण : कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलिसांवर काय कारवाई केली ? उच्च न्यायालयाचा सवाल
Pune driving opposite direction, driving in the opposite direction,
पुणे : विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्या बेशिस्तांवर कडक कारवाई
devendra fadnavis on women complaints
महानगरातील आव्हाने पेलण्यासाठी पोलीस दलात अत्याधुनिक सुविधा- महिलांच्या तक्रारी प्राधान्याने सोडविण्याचे गृहमंत्री फडणवीस यांचे आदेश
Jai Bhim Nagar, huts in Jai Bhim Nagar,
मुंबई : जयभीमनगर प्रकरण; झोपड्यांवर कारवाई करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करणार, राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती

हेही वाचा >>>गोविंदाच्या टी-शर्टवर राजकीय संदेश अन् नेत्यांची छबी; आजी, माजी, भावी, इच्छुक लोकप्रतिनिधींचा टी-शर्टआडून प्रचार

अधिकाऱ्यांमध्ये तणाव

भूमिगत बाजारविषयात काहीच प्रगती न झाल्याचे पालकमंत्र्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी प्रशासनाला इशारा दिला. त्यांनी शुक्रवारी मुंबई व ठाण्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई केली. त्यातच बाजारविषयाच्या अधिकाऱ्यांनाही कारवाईचा इशारा दिल्यामुळे पालिका अधिकाऱ्यांमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे.