लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबईत विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली असून मुंबईत पावसाचा जोर वाढत आहे. मुंबई शहर आणि उपनगरांत शनिवारी पावसाचा जोर कायम होता. दरम्यान, सोमवारी मुंबईत अतिमुळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Roads around Dadar Railway Station breathed a sigh of relief
दादर रेल्वे स्थानक परिसरातील रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
What happens to your body when you have sex every day
रोज सेक्स केल्याने शरीर, मन व नात्यात काय बदल होतात? थट्टा, मस्करी न करता डॉक्टरांनी दिलेली ही माहिती वाचा
India Beat South Africa by 7 Runs and Win T20 World Cup 2024 Trophy
T20 World Cup 2024: भारत ठरला विश्वविजेता, सूर्यकुमार यादवचा झेल आणि जसप्रीत बुमराहचे षटक ठरला टर्निंग पॉईंट
Mumbai Thane Kalyan Bhiwandi Lok Sabha Election Result Live Updates in Marathi
Thackeray vs Shinde Lok Sabha Election Result 2024 Updates : मुंबईत ठाकरेंचे दोन, भाजपा अन् शिंदे गटाचा एक उमेदवार विजयी घोषित; दोन जागांवरचा निकाल प्रतिक्षेत!
South African fans object to Surya's catch
सूर्यकुमार यादवच्या ‘कॅच’वरुन पेटला नवा वाद, दक्षिण आफ्रिकन चाहत्याने VIDEO शेअर करत केला फसवणूक झाल्याचा दावा

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे मोसमी पाऊस सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे पुढील तीन ते चार दिवस राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडेल. दरम्यान, मुंबईत मागील दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. शनिवारी देखील पावसाचा जोर कायम होता. शहरातील दादर, परळ आणि मुंबई सेंट्रल भागात सकाळी जोरदार पाऊस कोसळत होता.

आणखी वाचा-पावसाळ्यातही रिक्षा-टॅक्सी चालकांकडून भाडे नाकारणे सुरूच

मुंबईत सोमवारी अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तर ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज कायम आहे. या कालावधीत रायगड, रत्नागिरी भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, शनिवारी संपूर्ण दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. मुंबई शहर तसेच उपनगरांत रविवारी हलक्या सरी कोसळतील. त्यानंतर सोमवारी पुन्हा पावसाचा जोर वाढेल. मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. यामुळे मुंबईकरांची असह्य उकाड्यापासून सुटका झाली आहे. तसेच मुंबईच्या कमाल तापमानातही घट झाली आहे. गेल्या २४ तासांत हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात २५ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात ३३ मिमी पावसाची नोंद झाली.

आणखी वाचा-मुंबई : वैद्यकीय प्रवेशाचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्याला कर्नाटक पोलिसांकडून अटक

मुंबईसह राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. विदर्भ आणि कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकणात अतिमुसळधार पावसाची, तर विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, मोसमी वाऱ्यांनी शनिवारी उत्तर प्रदेशचा काही भाग व्यापला असून मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असल्याचे हवामान विभागाने सांगितले. यामुळे पुढील दोन दिवसांत राजस्थानचा काही भाग , हिमाचल प्रदेशचा काही भाग व्यापेल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.