मुंबई : Mumbai Weather Effect on Railway Service मुंबई महानगरात बुधवारी पावसाने दमदार हजेरी लावली असून पावसामुळे मुंबईतील रस्त्यांवरील वाहतूक आणि लोकल सेवा मंदावली. अनेक ठिकाणच्या सखलभागात काही प्रमाणात पाणी साचल्याने वाहनचालकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील लोकल १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत आहेत. परिणामी, प्रवाशांना इच्छितस्थळी पोहचण्यास विलंब होत आहे.

मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने जोर धरला असून त्यामुळे मुंबईतील संपूर्ण वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. बुधवारी सकाळपासून पश्चिम द्रुतगती महामार्गावर दक्षिण मुंबईच्या दिशेने प्रचंड वाहतूक कोंडी झाली. तसेच पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या. अंधेरी, घाटकोपर, साकीनाका येथील रस्त्यांवर वाहन चालवणे वाहनचालकांना अवघड झाले.

Improvement in air quality in Mumbai
मुंबईतील हवेच्या दर्जात सुधारणा
Manoj Jarange, Manoj Jarange movement,
विश्लेषण : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव ओसरला?…
Mumbais temperature rises weather department observes that summer is in full swing
मुंबईत उन्हाळ्याची चाहूल
weather department predicts rising temperatures in Mumbai with increased afternoon heat expected
मुंबईतील तापमानात वाढ होण्याची शक्यता
Patients of cold cough fever in every house of Nagpur
नागपुरात घरोघरी सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण… तापमान बदलामुळे…
weather forecast maharashtra Summer heat cold February maharashtra weather department
फेब्रुवारीपासूनच उन्हाच्या झळा, राज्यातील थंडी संपली? हवामान विभागाचा अंदाज काय?
pune highest temperature marathi news
Pune Temperature : जानेवारीतील सर्वाधिक तापमानाचा नवा विक्रम; उष्णता का वाढली?
Maharashtra hailstorm loksatta news
उत्तर महाराष्ट्रात गारपीट, हलक्या पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान विषयक स्थिती आणि इशारा

हेही वाचा >>> मुसळधार पावसातदेखील मुंबईत १ जुलैपासून पाणीकपात होणार लागू; काय आहेत कारणे?

मध्य, पश्चिम, हार्बर मार्गावर दृश्यमानता कमी झाल्याने लोकलचा वेग मंदावला. त्यामुळे सकाळपासून लोकल विलंबाने धावत आहेत. मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल १५ ते २० मिनिटे आणि पश्चिम रेल्वेवरील लोकल १० ते १५ मिनिटे विलाबाने धावत आहेत. नियोजित लोकल वेळेवर येत नसल्याने महत्त्वाच्या स्थानकांमध्ये  प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढत आहे. दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण या स्थानकांत प्रवाशांची गर्दी वाढल्याने गोंधळ उडाला.

Story img Loader