नवी मुंबई, ठाणे, कल्याणमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबईसह उपनगरात पुढील काही तास मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. ऐन कामावरून घरी जाण्याच्या वेळेत पाऊस सुरू झाल्याने मुंबईत चाकरमान्यांची तारांबळ होताना दिसत आहे.

मुंबई आणि परिसरातील पावसाचा थेट फटका वाहतूक व्यवस्थेला बसतो. रस्त्यांवर पाणी साठणे, रेल्वे रुळांवर पाणी साठणे यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. त्यामुळे सायंकाळी कार्यालयातून घरी जाणाऱ्या चाकरमान्यांना काही अडचणींचा सामना करावा लागताना दिसत आहे.

MMRDA to construct a flyover at Kalyan Phata Chowk To solve traffic problem
कल्याण-शीळ फाटा कोंडीमुक्त होणार? उड्डाण पूल व भुयारी मार्ग ४२ महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Railway ticket inspector, passenger saved,
मुंबई : तिकीट तपासनीसाच्या सतर्कतेमुळे प्रवाशाला जीवदान
What is the solution to the Ghodbunder road traffic
घोडबंदर रस्त्याच्या कोंडीवर उपाय काय? नवे ठाणे कोंडीचे का ठरू लागलेय? 
vasai virar latest news in marathi
वसई विरार शहरात वाहने झाली उदंड, वाहतूक कोंडीच्या समस्येत भर; वर्षभरात ८४ हजार वाहने रस्त्यावर
The Meteorological Department has predicted light rain in Mumbai news
मुंबईत हलक्या सरींची शक्यता
heavy rain, heavy rain predicted for mumbai, Mumbai, Konkan, weather forecast, Thane, Palghar, heatwave, low pressure, Sindhudurg,
मुंबईत शनिवारी अतिमुसळधार पावसाचा अंदाज
Nagpur has lost its status as green city due to the reduction of green cover due to cement roads
नागपूरमध्ये सिमेंट रस्त्यांमुळे हरित आच्छादनात घट, ग्रीन सिटीचा दर्जा हिरावला

हवामान खात्याने म्हटलं आहे की, येत्या पाच दिवसांत आपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया हवामान खात्याच्या संकेतस्थळाला भेट द्या.

हेही वाचा : पावसामुळे भातपीक कापणी लांबणीवर पडणार; पावसाचा जोर वाढल्यास पिकाला धोका, शेतकरी चिंतेत

दरम्यान, परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान केलं आहे. साठवलेल्या कांद्यांपैकी जवळपास ४० टक्के कांदे सडले आहेत. शेतातील इतर पिकांनाही पावसाचा फटका बसला आहे.