लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: ऑगस्ट महिन्यात विश्रांती घेतलेल्या पावसाने गुरुवारपासून मुंबई शहर तसेच उपनगरांत दमदार हजेरी लावली. गुरुवारी पहाटेपासून सर्वत्र चांगला पाऊस झाला. मुंबईमध्ये गुरुवारी दिवसभर मुसळधार पाऊस कोसळत होता. मुंबईत शुक्रवारी सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. दरम्यान, हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

Patients of cold cough fever in every house of Nagpur
नागपुरात घरोघरी सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण… तापमान बदलामुळे…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
contractors warn to stop work for rs 90 thousand crores outstanding of development works during the election period
निवडणूक काळातील विकासकामांची ९० हजार कोटींची थकबाकी; कामे थांबविण्याचा ठेकेदारांचा इशारा
pimpri leopard news in marathi
पिंपरी : निगडीत बिबट्याचा शिरकाव; अडीच तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद
pune highest temperature marathi news
Pune Temperature : जानेवारीतील सर्वाधिक तापमानाचा नवा विक्रम; उष्णता का वाढली?
Panvel municipal corporation Inaugurates development works Chief Minister devendra fadnavis
पनवेलमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विकासकामांचे लोकार्पण
Maharashtra hailstorm loksatta news
उत्तर महाराष्ट्रात गारपीट, हलक्या पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान विषयक स्थिती आणि इशारा
rain of money through superstition and witchcraft in patur forest
अंधश्रद्धा व जादूटोण्यातून पैशांचा कथित पाऊस… पातूरच्या जंगलात नेमकं घडलं काय?

मुंबई शहर, तसेच उपनगरांत शुक्रवारी सकाळपासून संततधार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गुरुवारपासून पावसाचा जोर वाढला असून पुढील दोन ते तीन दिवस मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानुसार गुरुवारपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात शुक्रवारीही पावसाचा मुक्काम कायम होता.

आणखी वाचा- पनवेल-कर्जत रेल्वे मार्गावरील तीनपैकी एका बोगद्याच्या कामाला गती

ओडिशा आणि छत्तीसगड येथे असलेली चक्रीय वात स्थिती, पूर्व पश्चिम कमी दाबाचे क्षेत्र, तसेच अरबी समुद्रावरून येणारे वारे आणि मान्सूनचा आस मूळ स्थितीपासून दक्षिणेकडे सरकल्यामुळे राज्यात पाऊस आहे. दरम्यान, कोकण, उत्तर महाराष्ट्र, तसेच विदर्भात ९ सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

Story img Loader