मुंबई : ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली. विविध कारणांनी कल्याण-कसारा दरम्यानची रेल्वे वाहतूक संपूर्ण ठप्प झाली. यामुळे अनेक गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या. काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आले.

शनिवारी रात्रीपासून पावसाने जोर धरला. रविवारी पहाटेही मुसळधार पाऊस कायम राहिल्याने ठाणे जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहू लागल्या. आटगाव-तानशेत दरम्यान भूस्खलनामुळे रेल्वे रुळावर ढिगारा वाहून आला. खडावली-टिटवाळा दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे व वाशिंद-खडावलीदरम्यान रूळ पाण्याखाली गेल्यामुळे कसारा मार्ग पूर्ण बंद झाला. परिणामी मुंबईच्या दिशेने येणाऱ्या अनेक गाड्या मनमाड, नाशिक, इगतपुरीपर्यंतच चालवण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले.मध्य रेल्वेवरील वासिंद स्थानकाजवळ ओव्हरहेड विजेचा खांब पाण्याच्या प्रभावामुळे उखडला गेला. त्यामुळे मुंबई-नाशिक मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली.

There has increase in number of potholes in Dronagiri node of Uran during monsoon
द्रोणागिरी परिसर खड्ड्यांत; पाऊस थांबल्याने मार्गावरील धुळीच्या उधळणीने प्रवासी आणि नागरिक त्रस्त
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Mumbai municipal administration, water accumulate,
मुंबई : रेल्वे रुळांवर पाणी का साचले ? पालिका प्रशासनाचे विचार मंथन
Road traffic in Mumbai collapsed, Mumbai rain,
मुंबई : पावसामुळे रस्ते वाहतूक कोलमडली
Water Logging due to heavy rainfall at Bhandup railway station.
Mumbai Local Train Updates : पावसामुळे १०० लोकल फेऱ्या रद्द; मेल-एक्स्प्रेस आठ तास खोळंबल्या
central railway cancelled 10 ac local service
मध्य रेल्वेचा ‘पांढरा हत्ती’ प्रवाशांसाठी त्रासदायक; वातानुकूलित लोकलच्या दहा फेऱ्या रद्द
fog on railway track
कल्याण: दाट धुक्यामुळे मध्य रेल्वे मार्गावर लोकल अर्धा तास उशिरा
MMRDA to construct a flyover at Kalyan Phata Chowk To solve traffic problem
कल्याण-शीळ फाटा कोंडीमुक्त होणार? उड्डाण पूल व भुयारी मार्ग ४२ महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य