मुंबई : ठाणे, तसेच पालघर जिल्ह्यांत पहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, हवामान विभागाने ठाणे आणि पालघर जिल्ह्यासाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे.

ठाणे, पालघर भागात गुरुवारी पहाटे दमदार पावसाने हजेरी लावली. या भागांमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. काही भागात पाणी साचले असून त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. दरम्यान, पुढील काही तासांत पावसाचा जोर आणखी वाढू शकतो, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. तसेच या भागांसाठी हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा इशारा नव्याने जारी केला आहे. तसेच कल्याण, डोंबिवली या परिसरात पहाटेपासून सर्वात जास्त पाऊस झाला.

college students in jeans and T Shirt
‘महाविद्यालयात जीन्स, टी-शर्ट बंदी, हा तर तालिबानी फतवा’; शिंदे गटाच्या आमदाराने केली कारवाईची मागणी
actor nawazuddin siddiqui share opinion on big budget movie with loksatta representative mumbai
एवढा अवाढव्य निर्मितीखर्च कशासाठी? – नवाझुद्दीन सिद्दीकी
8 Zika patients found in maharashtra in two months
राज्यात दोन महिन्यांत सापडले झिकाचे आठ रुग्ण; वैद्यकीय अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
15 old minor girl molested by her cousin in powai area
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
kitchen staff jobs in nair hospital vacant for many years
नायर रुग्णलयात रुग्णांना वेळेवर मिळेना जेवण! स्वयंपाकगृहातील कर्मचाऱ्यांची पदे अनेक वर्षांपासून रिक्त
frequent breakdowns in air-conditioned suburban trains on Western Railway will be controlled
मुंबई : पश्चिम रेल्वेवरील गारेगार प्रवास निर्विघ्न
distribution of house rent and shops in transit camp to bdd residents
८४२ रहिवाशांना घराची हमी; बीडीडीवासीयांना घरभाडे वा संक्रमण शिबिरातील गाळ्यांचे वितरण
Mumbaikars hit by Gastro and Dengue 1395 patients of epidemic diseases in June
गॅस्ट्रो, हिवतापाने मुंबईकर हैराण, जूनमध्ये साथीच्या आजारांचे १,३९५ रुग्ण
mhada houses scam distribution of mhada houses to the winners before the inquiry report submitted
म्हाडा घरांच्या सोडतीत गैरप्रकार, चौकशी अहवाल सादर होण्यापूर्वीच विजेत्यांना घरे वितरणाचा घाट?

हेही वाचा…आयआयटी मुंबईच्या विद्यार्थांनी केले रामायणावर विडंबनात्मक नाटक, प्रशासनाने विद्यार्थ्यांना ठोठावला १.२ लाख रुपये दंड

मुंबई आणि उपनगरांतही पावसाचा जोर वाढला आहे. दरम्यान, यंदा लवकर दाखल झालेल्या मोसमी पावसाने काही दिवस विश्रांती घेतली होती. परिणामी, मुंबईकरांना उकाड्याचा सामना करावा लागला. मुंबई आणि उपनगरांत बुधवारपासून पावसाने हजेरी लावली असून वातावरणात गारवा निर्माण होऊन नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.