मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठय़ात वाढ होऊ लागली आहे. गुरुवारी दिवसभर पडलेल्या पावसामुळे पाणीपातळीत  ३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबईला ऊर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांमधून दरदिवशी ३९०० दशलक्ष लिटर एवढा पाणीपुरवठा केला जातो. या सात धरणांची एकूण पाणीसाठवण क्षमता १४ लाख ४७ हजार ३५३ दशलक्ष लिटर इतकी आहे. मात्र, यंदा पावसाचा लंपंडाव लक्षात घेता मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट घोंगावत आहे.

सप्टेंबरमध्ये पुरेसा पाऊस न पडल्यास मुंबईकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागेल, असे मुंबई महानगरपालिकेच्या जलभियंता विभागाकडून सांगण्यात आले होते. गुरुवापर्यंत धरणांमधील जलसाठा काही प्रमाणात आटला होता. जुलै महिन्यात तुळशी, विहार, तानसा व मोडकसागर हे चार तलाव पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागले होते. मात्र, विहार वगळता इतर तलावांची पाणीपातळी पुन्हा खालावली होती. त्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली. मात्र, गुरुवारी पहाटेपासून बरसणाऱ्या मुसळधार पावसाने मुंबईकरांना दिलासा दिला आहे.

Mumbai water supply cut
भांडूप, कुर्ला, अंधेरी, जोगेश्वरी ते वांद्रे परिसरातील पाणीपुरवठा बुधवारी बंद, ३० तासांसाठी पाणीपुरवठा बंद
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Maharashtra hailstorm loksatta news
उत्तर महाराष्ट्रात गारपीट, हलक्या पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान विषयक स्थिती आणि इशारा
High Court orders No sale or immersion of POP Ganesh idols for Maghi Ganeshotsav
माघी गणेशोत्सवासाठी पीओपी गणेशमूर्तींची विक्री आणि विसर्जन नको
mumbai temprature today
Mumbai Temprature: मुंबईत तापमान सामान्य पातळीच्याही खाली, पण गारवा अल्पकाळासाठीच; वाचा काय आहे हवामान विभागाचा अंदाज!
Action plan for water transport in Mumbai news
मुंबईतील जलवाहतुकीसाठी कृती आराखडा
Amit Shah maha kumbh ANI
Maharashtra Breaking News Updates : महाकुंभ : अमित शाहांचं त्रिवेणी संगमावर शाही स्नान
municipality has decided to cut water supply in Dadar Santacruz Andheri and Bhandup due to leakage of Tansa water channel
तानसा जलवहिनीला गळती, दादर, सांताक्रुझ, अंधेरीसह भांडुपमधील पाणीपुरवठा खंडित

हेही वाचा >>> Weather Update: राज्यात सर्वदूर पाऊस; कोकण, घाटमाथ्यावर अतिवृष्टी

हेही वाचा >>> वंशावळ शब्द वगळण्यास सरकार तयार? जरांगेंनी आंदोलन तीव्र केल्याने निर्णय

गुरुवारी पहाटेपर्यंत ९०.३७ टक्के असणारा पाणीसाठा शुक्रवारी पहाटे ९३.१७ टक्क्यांवर पोहोचला. तलावांमध्ये सध्या १३ लाख ४८ हजार ४४९ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. तानसा व तुळशी पुन्हा पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले आहेत. तर, मध्य वैतरणा भरण्याच्या मार्गावर आहे. मागील दोन दिवसांप्रमाणे पावसाचा जोर कायम राहिल्यास पाणीकपातीची शक्यता कमी होऊ शकेल. ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठय़ात समाधानकारक वाढ होऊ शकली नाही. सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात धरणांमधील पाणीपातळी कमी होऊ लागल्याने मुंबईकरांची चिंता वाढली होती.

Story img Loader