आठवडय़ातून दोन दिवस विद्यार्थ्यांची शिकवणी घेण्याचे राज्य सरकारचे आदेश
शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी सातत्याने विविध प्रकारचे प्रयत्न करणाऱ्या केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने आता विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, नैतिक मूल्ये, पर्यावरण, सुप्रशासनाचे गुण रुजविण्यासाठी चक्क भारतीय प्रशासन सेवेतील (आयएएस) अधिकाऱ्यांना कामाला लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व सनदी व पोलीस अधिकाऱ्यांनी आपापल्या परिसरातील एक शाळा निवडून तेथे आठवडय़ातून दोन दिवस ज्ञानदानाचे काम करावे, असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. विद्यार्थ्यांना चांगल्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि अनुभवकथन व्हावे यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधण्याबाबतची योजना तयार करण्याचे आदेश पंतप्रधानांनी दिले होते. त्यानुसार या विभागाने ‘विद्यार्थ्यांसोबत सुसंवाद’ ही योजना आखली असून ती देशभर राबविण्यात येणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा