मुंबई : आयसीआयसीआय बँकेच्या संचालक मंडळाने फौजदारी कारवाईसाठी दिलेल्या मंजुरीला बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. तसेच, याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी घेण्याची मागणी केली आहे. मात्र, न्यायालयाने सोमवारी त्यांची ही मागणी मान्य करण्यास नकार दिला.

सीबीआयने दाखल केलेले खटले कधीच सुरू होत नाहीत. ते सुरू होण्यास वर्षे लागतात. त्यामुळे, कारवाईबाबतची कोचर यांची भीती अनाठायी असल्याचे त्यांच्या याचिकेवरील सुनावणी तीन आठवड्यांनंतर ठेवताना न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठाने मिश्किलपणे म्हटले.

navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Vashu Bhagnani denies selling office space to pay debt
२५० कोटींचे कर्ज फेडण्यासाठी विकलं ऑफिस? आमदार धिरज देशमुखांचे सासरे म्हणाले, “मी गेल्या ३० वर्षांपासून…”
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
Postcard, movement,
कुर्लावासियांचे पोस्टकार्ड आंदोलन सुरू, पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना किमान पाच हजार पत्र पाठविणार
devendra fadnavis analysis
“आपण तीन नाही, तर चार पक्षांशी लढत होतो, तो चौथा पक्ष म्हणजे…”; देवेंद्र फडणवीसांकडून लोकसभेतील निकालाचं विश्लेषण!
NCP MLA Rohit Pawar
“दोन दिवस थांबा, राज्याला हादरवून सोडणारा खुलासा…”, रोहित पवार यांचं मोठं विधान
mrunal dusanis says live in america is more difficult than India
“अमेरिकेत राहणं खूप अवघड”, चार वर्षांनी भारतात आलेल्या मृणाल दुसानिसने सांगितलं परदेशातील राहणीमान, म्हणाली…

हेही वाचा – कुर्लावासियांचे पोस्टकार्ड आंदोलन सुरू, पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना किमान पाच हजार पत्र पाठविणार

आरोपनिश्चितीच्या प्रक्रियेसाठी कोचर दाम्पत्य आणि इतर आरोपींना विशेष न्यायालयाने उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. पुढील महिन्यात २२ तारखेला आरोपनिश्चितीची प्रक्रिया विशेष न्यायालय सुरू करणार आहे. आरोपनिश्चितीच्या प्रक्रियेदरम्यान दोन्ही बाजू ऐकल्यानंतर आणि सादर केलेले पुरावे विचारात घेऊन आरोपींनी गुन्हा केल्याचे सकृतदर्शनी मत खटला चालवणाऱ्या न्यायालयाकडून व्यक्त केले जाते. तसेच, खटल्याला सुरूवात केली जाते. या पार्श्वभूमीवर, कोचर यांच्या या याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी घेण्याची मागणी त्यांच्या वकिलांनी केली. दुसरीकडे, कारवाईला दिलेल्या मंजुरीचा मुद्दा खटल्याच्या कोणत्याही टप्प्यावर उपस्थित केला जाऊ शकतो, असा दावा करून केंद्र सरकारच्या वतीने अतिरिक्त महान्यायाभिकर्ता देवांग व्यास यांनी याचिकेवर तातडीने सुनावणीची आवश्यकता नसल्याचे न्यायालयाला सांगितले.

हेही वाचा – मुंबई : ट्रकच्या अपघातात ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

न्यायालयाने मात्र गेल्या दशकभरापासूनच्या याचिका प्रलंबित आहेत आणि या याचिकावरील सुनावणीस प्राधान्य देणे आवश्यक आहे. त्यामुळे, कोचर यांच्या याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी घेतली जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच, खटला चालवणाऱ्या न्यायालयाला ही याचिका प्रलंबित असल्याचे कळवण्याची आणि आरोपनिश्चितीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी वेळ मागण्याची सूचना न्यायालयाने कोचर यांना केली.