मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांत शुक्रवारी पहाटेपासून अनेक भागात पाऊस कोसळत होता. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. शहर आणि उपनगरांत शुक्रवारी पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली होती. शहरातील परळ, कुलाबा, वरळी भागात पहाटे पावसाचा जोर वाढला होता. उपनगरातील वांद्रे, अंधेरी परिसरातही पाऊस कोसळत होता. त्यानंतर दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. दरम्यान, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत पुढचे दोन – तीन दिवस हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल.

हेही वाचा >>> इंद्राणी मुखर्जीच्या परदेशवारीस उच्च न्यायालयाचा नकार; सीबीआयची विरोध करणारी याचिका योग्य ठरवली

no decision has been taken on mechanism to fill pothole in City Post premises after 24 hours
‘खड्ड्यांत’ गेलेल्या पुण्यात खड्डा बुजविण्यावरून ‘खड्डाखड्डी’!
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा…
after Ganeshotsav is over there is a rush to buy fish
उरण : गणेशोत्सव संपताच मासळी खरेदीसाठी गर्दी
leopard got stuck in a cage set up by the forest department in Girda village Buldhana | गिरडा शिवारात पुन्हा 'ट्रॅप'!सहावा बिबट अडकला पिंजऱ्यात; 'ती' अडकली, 'तो' रेंगाळला... ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता
गिरडा शिवारात पुन्हा ‘ट्रॅप’!सहावा बिबट अडकला पिंजऱ्यात; ‘ती’ अडकली, ‘तो’ रेंगाळला…
weather Department warning to some districts of heavy rain Today September 6
नागपूर : परतीच्या पावसाचा मुक्काम लांबण्याची शक्यता ?
navi Mumbai potholes kopar khairane marathi news
नवी मुंबई : कोपरखैरणे विभाग कार्यालय परिसरातही खड्डे, डासांचा प्रादुर्भाव; नागरिक, कर्मचाऱ्यांना पाठदुखीचा त्रास
Two people washed away, flood Wardha,
वर्धा : दुचाकीसह दोघे पुरात वाहून गेले, दोन दिवसात…
ST bus washed away in flood water in Parbhani
परभणी : पुराच्या पाण्यात एसटी बस गेली वाहून, मानवत तालुक्यातील घटना

मागील काही दिवस उसंत घेतलेल्या पावसाने शहर आणि उपनगरांत बुधवारी दमदार हजेरी लावून हाहाकार उडवला. बुधवारी संध्याकाळी सुरू झालेल्या पावसामुळे ठिकठिकाणच्या सखल भागात पाणी साचले होते .रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. रुळांवर पाणी साचल्याने लोकलची एका मागोमाग एक रांग लागली होती. काही प्रवासी लोकलमध्ये, तर काही रेल्वे स्थानकांवर अडकले होते.

हेही वाचा >>> Mumbai Local Train Update : पश्चिम रेल्वेवर १० तासांचा ब्लॉक; अनेक लोकल रद्द, तर काहींच्या वेळेत बदल

पावसाळी वातावरण, ढगाळ हवामानामुळे मुंबईतील उकाडा काहीसा कमी झाला आहे. दरम्यान, विजांचा कडकडाट हे परतीच्या पावसाचे लक्षण असले तरी परतीचा पाऊस सर्वदूर पडत नाही. तसेच राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे सध्या पडणारा पाऊस परतीचा नाही. मात्र, ही स्थिती कायम राहणार नसल्याचे हवामान विभागाने सांगितले. दरम्यान, नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी परतीचा प्रवास सुरू केला आहे. राजस्थान आणि गुजरातच्या आणखी काही भागांतून मंगळवारी मोसमी वारे परतले आहेत. मात्र, मागील दोन दिवसांपासून मोसमी वारे एकाच जागेवर होते. तसेच उत्तर महाराष्ट्र आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असून त्यापासून उत्तर बांगलादेशापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. मुंबईबरोबरच सर्वत्र राज्यात मागील दोन दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत होता. मात्र शनिवारपासून राज्यातील पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.