अभिनेता सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणातील आरोपी अनुज थापन याने नुकतीच पोलीस कोठडीत आत्महत्या केली. त्यामुळे पोलीस कोठडीतील आरोपींच्या मृत्यूचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. देशात २००१ ते २०२० या २० वर्षांच्या काळात एक हजार ८८८ जणांचा कोठडीत मृत्यू झाला आहे. याप्रकरणी ८९३ पोलीस कर्मचार्यांवर गुन्हे नोंदवण्यात आले आणि ३५८ कर्मचार्यांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले. या कालावधीत केवळ २६ पोलिसांना दोषी ठरवण्यात आले होते. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभाग नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या २००१-२०२० च्या अहवाल वरील माहिती जाहीर करण्यात आली होती. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अहवालानुसार, २०२१-२२ मध्ये (फेब्रुवारीपर्यंत) दोन हजार १५२ आरोपींचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. तसेच १५५ आरोपींचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. न्यायालयीन कोठडीत मृत्यूच्या बाबतीत उत्तर प्रदेश आघाडीवर आहे. येथे ४४८ आरोपींचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. त्याचबरोबर महाराष्ट्रात सर्वाधिक १२९ जणांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता. ही बाब खूप गंभीर आहे. देशात दररोज ६ आरोपींचा कोठडीमध्ये मृत्यू होत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा