मधु कांबळे

मुंबई : महाविकास आघाडीत सांगली, भिवंडी व दक्षिण-मध्य मुंबई या तीन मतदारसंघांवरून निर्माण झालेला तिढा कायम आहे. या तीन मतदारसंघांवर दावा करणाऱ्या काँग्रेसला शिवसेना (ठाकरे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांनी एकाकी पाडल्याचे चित्र आहे.

Prayagraj Stampede
Mahakumbh Stampede: महाकुंभमध्ये चेंगराचेंगरीनंतर पंतप्रधान मोदींचा तीन वेळा योगी आदित्यनाथांना फोन, नेमकी चर्चा काय झाली?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
Ajit Pawar On Mahayuti Politics
Ajit Pawar : राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले…
Rahul Gandhi list on dishonest people
‘आप’च्या बेईमानांच्या यादीत राहुल गांधींचाही समावेश, भाजपानंतर आता थेट काँग्रेसही लक्ष्य
loksatta editorial on devendra fadnavis
अग्रलेख : आजचे बालक; उद्याचे पालक!
Dhairyasheel Mohite Patil
Dhairyasheel Mohite Patil : “सवय बदला, अन्यथा मोजून आठवड्याच्या आत…”, खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा
Chandrakant Patil will be responsible for party expansion in Sangli
सांगलीत पक्ष विस्ताराची जबाबदारी चंद्रकांत पाटलांवर

महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत काँग्रेसने या तिन्ही मतदारसंघांवरचा दावा कायम असल्याचे सांगितले, परंतु त्यावर शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मौन धारण करणे पसंत केले. त्यावरून महाविकास आघाडीत सध्या तणावपूर्ण शांतता असल्याचे मानले जात आहे. महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गट व काँग्रेस यांच्यात सांगली मतदारसंघाचा वाद विकोपाला गेला आहे. भिवंडीवर राष्ट्रवादीने दावा केला आहे, त्यालाही काँग्रेसचा विरोध आहे. दक्षिण-मध्य मुंबई हा मतदारसंघ काँग्रेसला हवा; परंतु या जागेवरही शिवसेनेने हक्क सांगितला असून, अनिल देसाई यांची उमेदवारीही जाहीर केली आहे. काँग्रेसने कितीही संताप व्यक्त केला तरी शिवसेना त्याची कसलीही दखल घ्यायला तयार नाही.

हेही वाचा >>>कामा रुग्णालयामध्ये सुरू होणार नऊ नवे विभाग; मुंबई, ठाणे, भिवंडी, नवी मुंबई व रायगडमधील रुग्णांना दिलासा मिळणार

वाद दिल्लीत

सांगली व भिवंडीचा वाद दिल्लीपर्यंत पोहोचला; परंतु काही झाले तरी आघाडीत बिघाड निर्माण होऊ द्यायचा नाही, अशी काँग्रेस नेतृत्वाची भूमिका असल्यामुळे राज्यातील नेत्यांची पंचाईत झाल्याचे सांगितले जाते. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची गुरुवारी हॉटेल ट्रायडंट येथे बैठक झाली. लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या एकत्रित प्रचाराची रणनीती ठरविण्यासाठी ही बैठक होती. कोणकोणत्या मुद्दय़ांवर भाजप व त्यांच्या मित्रपक्षांच्या विरोधात प्रचार करायचा यावर चर्चा झाली. मात्र तरीही या बैठकीत सांगली, भिवंडी, दक्षिण-मध्य मुंबई हे तीन मतदारसंघ काँग्रेसकडे राहिले पाहिजेत, असा आग्रह धरल्याची माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली. परंतु बैठकीत त्यावर काही चर्चा झाली नाही. प्रामुख्याने निवडणूक प्रचाराचे नियोजन, त्याबाबतचे सादरीकरण यावरच प्रामुख्याने चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. प्रचाराच्या नियोजनाबाबत ही बैठक होती, त्यामुळे इतर कोणत्या विषयावर चर्चा झाली नाही, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

Story img Loader