लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: मुंबईत उन्हाच्या झळांची तीव्रता वाढली असून रखरखत्या उन्हाने हैराण झालेले नागरिक कोरड पडलेल्या घशाला थंडावा देण्यासाठी कृत्रिम शीतपेयांऐवजी उसाच्या रसाला अधिक पसंती देत आहेत. परिणामी, अत्यंत माफक दरात उपलब्ध होणाऱ्या ताज्या उसाच्या रसासाठी रसवंतीगृहांमध्ये ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे.

Advanced Artificial Intelligence Techniques for Flood Forecasting
कुतूहल : पुराच्या अंदाजासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
betel leaves expensive, betel leaves,
विड्याची पाने का महागली ? जाणून घ्या, अतिवृष्टी, संततधारेचा परिणाम काय?
Sakkardara lake, Nagpur, unsafe,
नागपूरच्या प्रसिद्ध सक्करदरा तलाव परिसर सर्वसामान्यांसाठी असुरक्षित, काय आहेत कारणे?
Gold Silver Price
Gold-Silver Price: ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद! दरवाढीनंतर सोन्याचे भाव झालेत कमी, १० ग्रॅमची किंमत जाणून घ्या
tanishq and de beers collaboration to boost India s natural diamond jewellery market
डी बीयर्सशी भागीदारीतून हिऱ्यांच्या ग्राहकांमध्ये दुपटीने वाढीचे तनिष्कचे लक्ष्य
Only 14 thousand 839 applications in 117 days for allotment of 2030 houses of Mumbai Mandal of MHADA Mumbai news
सोडतपूर्व प्रक्रियेला १५ दिवसांची मुदतवाढ ? म्हाडाकडे ११७ दिवसांमध्ये केवळ १४ हजार ८३९ अर्ज
Gold Silver Price
Gold-Silver Price: रक्षाबंधनाच्या दिवशी सोन्याच्या किमतीत बदल, मुंबई-पुण्यातील १० ग्रॅमची किंमत ऐकून ग्राहक थक्क

उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होत असते. अनेक जण निरनिराळ्या प्रकारच्या शीतपेयांनी आपली तहान भागवितात. असे असले तरी शरीरासाठी अधिक फायदेशीर असणारा उसाचा रस नागरिकांच्या पसंतीस उतरत आहे. चवीला अत्यंत मधुर व शीतल असणारा उसाचा रस कॅल्शियम, पोटॅशिअम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस आदी विविध पोषक तत्वांचा ऊर्जास्रोत आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या विविध ब्रँड्स आणि चवीच्या कृत्रिम शीतपेयांमध्ये अत्यंत घातक द्रव्ये असतात. या शीतपेयांमुळे मुतखडा, रक्तवाहिन्या कठीण होणे, मधुमेह, स्थूलता आदी विविध आजार जडण्याची दाट शक्यता असते. शिवाय काही क्षणापुरते शरीराला थंडावा देणाऱ्या कृत्रिम शीतपेयांमध्ये अधिक प्रमाणात उष्ण घटक असतात. कोरोनाकाळानंतर आरोग्याच्या बाबतीत दक्ष असलेले नागरिक सध्या उसाच्या रसाला पसंती देऊ लागले आहेत.

हेही वाचा… “राष्ट्रवादीतील परिस्थितीला संजय राऊतच जबाबदार”, शरद पवारांच्या राजीनाम्यावरून संजय शिरसाटांचं टीकास्र; म्हणाले, “अजित पवार अन्…”

यंदा ग्राहकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. पूर्वी १०० किलो उसाची मागणी होती. मात्र, ग्राहकांच्या संख्येत वाढ झाल्याने ती आता २०० किलोवर गेली आहे. पूर्वी दिवसाला १५० ते २०० ग्राहक दुकानात येत होते. मात्र आता ग्राहकांची संख्याही वाढली असून ३०० ते ४०० ग्राहक उसाचा रस पिण्यासाठी येत असतात, असे दादरमधील रसवंतीगृहाचे मालक राजाराम पवार यांनी सांगितले.

हेही वाचा… मुंबई: माथाडी कामगारांसाठी आरक्षित भूखंडावरील अतिक्रमणे जमीनदोस्त!

बाजारात इतर पारंपारिक पेयांनाही मागणी

पारंपारिक व नैसर्गिक पेयांचे महत्त्व जाणणारे ग्राहक उसाच्या रसाबरोबरच लिंबू, कोकम, आवळा सरबत, शहाळ्याचे पाणी आदी नैसगिर्क पेयांना पसंती देत आहेत. तसेच बाजारात ताक, पन्हे, लस्सी, पियुष, जलजिरा, विविध फळांचा रसचा आस्वादही ग्राहक घेत आहेत.