मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाल्यामुळे आता मुंबई महापालिकेत सुरू असलेला पालकमंत्र्यांचा हस्तक्षेप कमी होणार आहे. पालिका मुख्यालयात होणाऱ्या बैठका, घटनास्थळावरील भेटीगाठी थंडावणार आहेत. लोकसभेची निवडणूक जाहीर झाली असून आचारसंहिता लागू झाली आहे. लोकसभा निवडणूक- २०२४ संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने लागू केलेल्या आदर्श आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत. त्यात मुंबईतील सर्व फलक तत्काळ हटवावे, असेही आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर आचारसंहितेमुळे आता पालकमंत्र्यांच्या हस्तक्षेपावरही बंधने येणार आहेत.

मुंबई महापालिकेत सध्या शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नियमित बैठका होत असतात. जुलै महिन्यात मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासाठी स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात आले. त्यानंतर केसरकर यांनीही मुख्यालयात येण्यास सुरुवात केली. दर आठवड्याला या दोन मंत्र्यांच्या आढावा बैठका मुख्यालयात होतात. त्यावेळी संबधित अधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलावले जाते व बैठक संपेपर्यंत सर्व विभागाचे अधिकारी ताटकळत असतात.

Bhoomipujan municipal development works Mumbai,
मुंबई : आचारसंहितेपूर्वी महापालिकेच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोमवारी कार्यक्रमांचा धडाका
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
big decision of Modi government, agriculture sector,
कृषी क्षेत्राबाबत मोदी सरकारचा आणखी एक मोठा निर्णय जाणून घ्या, तिन्ही योजनांची सविस्तर माहिती
nitin gadkari
नागपूर:‘लोकसभा’ जिंकण्यासाठी गडकरींनी केला होता ‘हा’ नवस…
Satyashodhan Committee, High Court slams central government, amendment of law,
केंद्र सरकारला उच्च न्यायालयाचा तडाखा, सत्यशोधन समिती स्थापन करण्याबाबतची कायदादुरूस्ती घटनाबाह्य ठरवून रद्द
Who is BJP face for Delhi poll campaign Smriti Irani
Smriti Irani for Delhi CM: अमेठीत पराभव आता दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी संभाव्य दावेदार, भाजपा दिल्लीची सूत्रे स्मृती इराणींच्या हाती देणार?
eknath shinde on one nation one election
CM Eknath Shinde : ‘एक देश, एक निवडणुकी’च्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “या निर्णयामुळे…”
shiv sena bjp conflict over regularizing construction built by project victims in navi mumbai and panvel
प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर नवी मुंबईत महायुतीतच धुसफुस ?

हेही वाचा : महालक्ष्मी रेसकोर्स आणि विलिंग्डन क्लबसाठी ५० आजीव सदस्य नामनिर्देशित करण्याचा निर्णय रद्द करा

मात्र आता आचारसंहितेमुळे पालकमंत्र्यांच्या कामकाजाला मर्यादा येणार आहेत. केसरकर हे दर बुधवारी मुख्यालयात घेत असलेली बैठक आता होऊ शकणार नाही. बैठका घेणे, पालिकेच्या विविध कार्यालयात किंवा प्रकल्पस्थळी भेट देणे, अधिकाऱ्यांना बोलावणे या बाबी करता येणार नाहीत. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून दबावाखाली असलेल्या अधिकाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.